विविध मागण्यांसाठी "वंचित' चे निवेदन:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी

2 days ago 3
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, कापसाला १५ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा. पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट हेक्टरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज १५ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना दिले आहे. शेतकऱ्याचे नगदी पीक असलेला कापूस व सोयाबीन पावसामुळे वाया गेले आहे. सोयाबीन पिकाची सोंगणी व काढणी करणे दुरापास्त झाले आहे. त्यात भरीस भर म्हणून शेत मालाचे भाव पडले आहेत. या संकटातुन बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष गवई, साहेबराव भगत, देवाभाऊ दामोदर, सरपंच रमेश नाईक, सुरेश वाघोदे, सुनील भटकर, परमेश्वर पारवे, सुरेश सिरसाट,भास्कर जुमळे व महेंद्र जाधव यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article