शरद पवारांच्या हुशारीमुळेच बाळासाहेबांची शिवसेना फुटली:84 वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले, आमदार रामदास कदमांची टीका

3 days ago 2
शरद पवार यांच्यामुळेच बाळासाहेब यांची शिवसेना फुटली अशी टीका शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी केली आहे. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ सोडण्यास तयार होते. मी सर्व आमदारांना मातोश्रीवर आणायला तयार होतो. पण त्यापूर्वी शरद पवार मातोश्रीवर पोहोचले आणि उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली. बाळासाहेब हयात असताना जे शरद पवार यांना जमले नाही ते त्यांनी आता करुन दाखवले, असा हल्लाबोल शरद पवार यांच्यावर केला. शरद पवार यांनी फलटण येथील एका सभेत 'तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचे आहे. 84 होवो किंवा 90 हा म्हतारा काही थांबत नाही. हे म्हतारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही' असे वक्तव्य केले होते. या वक्त्यावरही रामदास कदम यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांनी शंभरी गाठावी. पण, 84 वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. तुम्ही अनेक पावसाळे बघितले. तुमच्या हुशारीमुळेच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. टोलमाफीमुळे कोकणातील जनता सरकारव खुश रामदास कदम यांनी टोलमाफीच्या निर्णयावरही भाष्य केले. टोलमाफीचा निर्णय लोकाभिमुख आहे. या निर्णयामुळे लोकांचे हजारो रुपये वाचतील. कोकणातील जनता सरकारवर खुश आहे. असे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे विधानसभा निवडणुकीबाबत रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहत आहेत. पण त्यांनी आत्मचिंतन करावे. कोकणावर संकट आल्यावर शरद पवार कोकणात आले. पण उद्धव आणि आदित्य ठाकरे आले नाहीत. लोकाभिमुख निर्णयाला महाराष्ट्रातील जनता साथ देईल. राज्यात महायुती 200 च्या जवळपास जागा जिंकेल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. हेही वाचा... 90 वर्षांचा झालो तरी मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार- पवार:पक्षाची सूत्रे कुणाकडेही देणार नसल्याचे स्पष्ट संकेत वय झाल्यामुळे आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळावी म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून बाजूला व्हावे आणि आपल्याला संधी द्यावी असा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. त्याला आधी होकार देऊन नंतर शरद पवार मागे फिरले होते. त्यानंतर ते सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सूत्रे देतील, अशी चर्चा होती. मात्र, आपण निवृत्ती घेणार नाहीच. पक्षाची सूत्रे दुसऱ्या कुणाकडेही देणार नसल्याचे संकेत ८४ वर्षीय शरद पवारांनीच सोमवारी दिले. पूर्ण बातमी वाचा... खरी राष्ट्रवादी कोणाची? यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:गेल्या वेळी सुनावणी न घेताच न्यायपीठ उठले; निवडणुकीपूर्वी निर्णय देण्याची शरद पवार गटाची मागणी खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अजित पवार गट आणि शरद पवार गटात सुरू असलेल्या खटल्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या खटल्याची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार होती, मात्र न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्वल भुईया यांच्या पीठाने सुनावणी न घेताच पुढे ढकलली होती. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article