शरद पवारांना आता अक्कलदाढ फुटत आहे:​​​​​​​आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवण्याच्या भूमिकेवरून आमदार गोपींचद पडळकर यांचा घणाघात

2 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75 टक्के करण्याच्या केलेल्या सूचनेचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. शरद पवार 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले, पण आता त्यांना अक्कलदाढ येण्यास सुरुवात झाली आहे, असे ते म्हणालेत. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. त्यातच धनगर समाजानेही एसटी आरक्षणासाठी जोर लावला आहे. यामुळे सरकारपुढे जातीय सलोख टिकवण्याचे आव्हान उभे टाकले असताना शरद पवारांनी सरकारला आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याचा सल्ला दिला होता. तसेच केंद्र सरकारने यासंबंधी पाऊल उचलले तर आपला पक्ष त्याला पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या या विधानाचा समाचार घेत पवारांना आता अक्कल आल्याचा घणाघात केला. पवारांना 80 वर्षांनंतर अक्कल येण्यास सुरुवात गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवारांना 80 वर्षांनंतर अक्कल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना आता अक्कलदाढ फुटत आहे. ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. पण तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. पण आता ते अशी भूमिका घेत आहेत. आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा व धनगर समाजाच्या शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या. शरद पवारांनी तेव्हाच हे केले असते तर या आत्महत्या टळल्या असत्या. ते आता 50 टक्क्यांची अट ओलांडण्याची भाषा करत आहेत. त्यांनी त्यांचे सरकार असताना याविषयी एखादे पाऊल का उचलले नाही? पुन्हा सत्तेत आले की ते आरक्षण हा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याचा कांगावा करतील. शरद पवार हे मिनी औरंगजेब उल्लेखनीय बाब म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या नामांतरावरून शरद पवारांवर ते मिनी औरंगजेब असल्याची टीका केली होती. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. ते आपल्या उभ्या आयुष्यात केवळ दोनवेळा रायगडावर गेले. नुकतीच त्यांच्यापुढे अहमदनगरचे नाव अहमदनगरच रहावे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी करणारे लोक कोण होते? याची चौकशी झाली पाहिजे. शरद पवारांनी आमच्या धनगर समाजाचे तर पार वाटोळे केले, असे ते म्हणाले होते. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी यावेळी आपण जत विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचेही संकेत दिले. मी जत विधानसभेतून लढावे ही जनतेचीच इच्छा आहे, असे ते यासंबंधी म्हणालेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article