मोठी बातमी, अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर, केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी, जिल्ह्याचे नाव बदलले

2 hours ago 2

Ahilyanagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

मोठी बातमी, अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर, केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी, जिल्ह्याचे नाव बदलले

अहमदनगर नाही अहिल्यानगर

| Updated on: Oct 04, 2024 | 4:48 PM

अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article