डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत प्रथमच संभाजीनगर शहरात:विविध विषयांवर उद्योजकांशी साधणार संवाद

2 hours ago 1
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे अध्यक्ष प्रथमच संभाजीनगर शहरात भेट देणार असून 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता ते मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे शहरातील उद्योजकांची संवाद साधणार आहेत. सशस्त्र दलांना आवश्यक असलेल्या अत्याधुनिक शस्त्र प्रणालींच्या स्वदेशी रचना विकास आणि उत्पादनासाठी डीआरडीओ कार्यरत आहे. क्षेपणास्त्र, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, लढाऊ वाहने इत्यादी क्षेत्रांमध्ये भविष्यकालीन संरक्षण तंत्रज्ञान विकास करण्याची जबाबदारी डीआरडीओ अत्यंत समर्थपणे पार पाडत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान इत्यादींच्या माध्यमातून देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवण्याचे ध्येय डीआरडीओचे आहे. भारतात डीआरडीओच्या सुमारे 41 प्रयोगशाळा आणि पाच यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर हे औद्योगिक दृष्ट्या भारतातील महत्त्वाचे शहर असून उद्योगधंद्याच्या प्रगतीत या शहराचे योगदान महत्त्वाचे आहे.ऑरिक सिटी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या शहरांमध्ये सुरू आहेत किंवा येऊ घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर डीआरडीओचे अध्यक्ष शहरास भेट देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर हे फर्स्ट जनरेशन आंत्रप्रिनिओर शहर म्हणून ओळखले जाते. शहराची औद्योगिक क्षमता जाणून घेण्यासाठी तसेच येथील उद्योजकांची संवाद साधण्यासाठी अध्यक्षांची भेट आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडा ऑटो क्लस्टर, सीएमआयए, मसिआ, सीआयआय, लघु उद्योग भारती या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या उद्योग संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उद्योजक तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष मिलिंद कंक यांनी केले आहे. हेही वाचा... राज्य मंत्रिमंडळ निर्णय:पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती - सिल्लोड तालुक्याला सिंचनाचा लाभ मिळणार राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सिल्लोड तालुक्याला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पहा....पूर्ण बातमी वाचा... मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय?:काय आहेत निकष आणि फायदा काय होणार? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाने जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटला असणार. मराठी भाषेसोबतच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भाषांना देखील अभिजात दर्जा देण्यात आला आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पण अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? चला बघूया. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article