नगरचे झाले आहिल्यानगर, केंद्र सरकारची जिल्ह्याच्या नामांतराला दिली मंजुरी

2 hours ago 1

नगर जिल्ह्याचे नामांतर आता आहिल्यानगर झाले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करावे अशी मागणी होती. तसेच अहमदनगरचे नाव बदलून आहिल्यानगर करावे अशीही मागणी होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर नगरचे नामांतर झाले नव्हते. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाईल, अशी माहिती दिली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article