शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढला आठवण मोर्चा

2 hours ago 1
कापसाला दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, मंजूर पीक विम्याचे तत्काळ वाटप करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कांॅग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर टाळ-मृदंग वाजवत आठवण मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुकाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकताच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यात मागील २००९ मध्ये कापसाला सहा हजार रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी वारकरी मोर्चा काढला होता. परंतु, आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. मात्र त्यांना केलेल्या आंदोलनाचा विसर पडला आहे. त्यांना त्या आंदोलनाची आठवण करुन देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आठवण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी व कार्यकर्ते टाळ मृदंग घेऊन सहभागी झाले होते. कापसाला किमान दहा हजार भाव देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देणात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article