राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवळी टीका केली आहे. मात्र आज दसऱ्याच्या दिवशी पॉडकास्टमधून राज्यातील जतेशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी या बिघडलेल्या राजकारणावर पुन्हा एकदा आसूड ओढला आहे.
राज ठाकरे
आज दसरा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी विजया दशणीच्या शुभेच्छा देत आपण एकमेकांना सोन म्हणून आपट्याची पानं देत असतो. पण महाराष्ट्राचं सोनं तर गेले अनेक वर्ष लुटलं जातंय, आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही रहात नाही आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत, पण आमचं दुर्लक्ष … आम्ही कधी आमच्या आयुष्यात मगन् तर कधी जाती-पातीमध्ये मश्गुल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी ? आजचा दसरा खूप महत्वाचा कारण तो निवडणुकीच्या तोंडावर आहे, अशावेळी बेसावध राहून चालणार नाही असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून संवाद साधताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यावर टीका करत आसूड ओढले.
ही बातमी अपडेट होत आहे.