RSS Mohan Bhagwat : गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत?

2 hours ago 1

विजयादशमीच्या दिवशी आरएसएस पूर्ण विधीपूर्वक शस्त्रपूजा करते. RSS ची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी झाली. दरम्यान, यावेळी भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले.

 गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत?

| Updated on: Oct 12, 2024 | 11:29 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात ‘शस्त्र पूजन’ करून दसरा उत्सवाला सुरुवात केली. आरएसएस दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदाही  शस्त्र पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. हा दिवस संघ कार्यकर्त्यांसाठी विशेष असल्याचे म्हणत त्यांनी गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर परखडपणे भाष्य केले. कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अहिल्याबाई होळकर आणि दयानंद सरस्वती यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. ‘अहिल्याबाई होळकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्य चालवले, त्यांनी स्वत:साठी काहीही न करता संपूर्ण देशात धर्म आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा बांधल्या. ते एक आदर्श आहेत, या निमित्ताने त्यांची आठवण येते.’, असे भागवत म्हणाले तर पुढे ते असे म्हणाले, दुर्बलता हा अपराध असल्याचे आवाहन त्यांनी हिंदूंना केले. ही बाब हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे दुर्बलता हिंदू समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी बांगलादेशातील हिंसक घटनावरून आणि हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावरून सांगितले. त्यांनी सध्याच्या घडामोडीचा आढावा घेत धर्मांधतेवर आसूड ओढला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article