संजय राऊत महाराष्ट्राला भांबावून सोडतात:रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबडतात, आमदार शहाजी बापू पाटील यांची आगपाखड

2 hours ago 1
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबड करतात. त्यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला भांबावून सोडले आहे, अशी टीका शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. शहाजी बापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेतील बंडावेळी 'काय झाडी, काय डोंगार' हा त्यांचा डायलॉग फारच फेमस झाला होता. त्यांनी शु्क्रवारी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबड करत आहेत. ते रोज महाराष्ट्राला भांबावून सोडण्याचे काम करतात. खऱ्या बापाचे असल्यासारखे त्यांनी एका शब्दावर ठाम रहावे. संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी आम्ही एवढी वर्षे मतदान केले. ते एवढ्या वर्षापासून खासदार आहेत. पण त्यांनी आतापर्यंत खासदार निधीतून कुठेही काम केल्याचे दिसत नाही. त्यांनी केलेले एखादे काम दाखवून द्या. ते आपल्या कामाबद्दल बोलत नाहीत. ते यावर बोलले तर त्यांचे तोंड कायमचे बंद होईल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार शहाजी पाटील पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येणार आहे. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघासाठी भरीव निधी मिळेल. माजी नजर गरुडासारखी आहे. मी दवाखान्यात असताना कुण कुठे? काय बोलत होते? हे सर्व मला माहिती आहे. डॉक्टरांनी मला दहावेळा ऑपरेशन करून घेण्याची विनंती केली. कुणाच्या शरिरावर बोलू नये, पण विरोधक माझ्या मरणाची वाट पाहत होते. त्यांना सांगतो, माझी अजून 35 वर्षे शिल्लक आहेत. मी सर्वांना खांद्यावर घेऊन जाणार आहे. जगणे - मरणे महत्त्वाचे नाही. परंतु दुसऱ्यासाठी झटणे हा मानव धर्म आहे. हा जन्म ईश्वराने दिले, असेही पाटील यावेळी बोलताना म्हणाले. हे ही वाचा... भाजप हरियाणासारखी महाराष्ट्रात बाजी मारणार?:शिंदेंच्या मराठा चेहऱ्यासह बसप, MIM चे एकेक मत महायुतीला लाभ पोहोचवणार मुंबई - हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर राहून पराक्रम गाजवण्याचा विचार करत आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत हरियाणात फारसे यश मिळाले नाही. पण त्यानंतर विधानसभा निवडणूक येईपर्यंत भाजपने येथील हरलेली लढाई जिंकून दाखवली. महाराष्ट्रातही असेच काही घडू शकते. महाराष्ट्रातही भाजपप्रणीत महायुतीला लोकसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. आता हरियाणासारखा डाव टाकून भाजप महाराष्ट्रातही बाजी मारण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेवर काम करत असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article