सरकारने कारखान्यांना फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी पाठबळ द्यावे:कोल्हे कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपप्रसंगी विवेक कोल्हे यांची मागणी‎

4 days ago 3
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना ऊस भावात कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. दिवाळीनिमीत्त कामगारांना २० टक्के सानुग्रह अनुदान देणार आहे. राज्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असून केंद्र व राज्य शासनाने कारखान्यांना फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर कारखान्याचे संचालक नीलेश देवकर व त्यांच्या पत्नी सोनल देवकर या यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्याचा सामना करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे योग्य मार्गदर्शन मिळत आहे. औद्योगिकीकरणांसाठी लागणाऱ्या पाण्याचे दर जास्त वाढवल्याने सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून निवेदन केले. त्यावर शासनाने इथेनॉल प्रक्रियासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे दर कमी करण्यांचे आश्वासन दिले. केंद्र शासनाने इथेनॉलबाबत शाश्वत धोरण घ्यावे म्हणजे चालू हंगामात त्याचा सहकारी साखर कारखानदारीला फायदा होईल. सहकारात कोल्हे कारखान्याने अनेक नवनवीन प्रकल्प सुरू ठेवत विविध उपपदार्थांची निर्मिती केली. देशातील साखर उद्योगाला दिशा दिली. पाण्याच्या प्रश्नांमुळे साखर कारखानदारीसमोर शाश्वत ऊस उपलब्ध होत नसल्याने हा उद्योग अल्पकाळ चालतो. त्यातून सर्वाधिक मोठा ऑफ सिझन राहतो. त्यामुळे कामगाराबरोबरच अन्य अनेक प्रश्न निर्माण होऊन आर्थिक आव्हाने उभी राहतात. त्याच्या सोडवणुकीसाठी केंद्र व राज्य शासनाने साखर कारखानदारीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग युनीटस् सुरू करून त्यासाठी भरीव आर्थिक पाठबळ द्यावे. त्यामुळे त्याचा परिसरातील शेतकऱ्याबरोबरच त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना फायदा होईल. सभासदांनी कार्यक्षेत्रातच जास्तीचा उस उपलब्ध व्हावा, यासाठी उसाच्या आडसाली, पूर्व हंगामी, सुरू लागवडी वाढवाव्यात. तसेच उसाचे खोडवे ठेवून त्याचे योग्य व्यवस्थापनही करावे, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास दत्तात्रय कोल्हे, विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, अरुण येवले, मोहन वाबळे यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते. टोमॅटो व सोयाबिनपासून उपपदार्थ बनवण्यात येणार येत्या काळात कोल्हे साखर कारखाना भूशापासून विटा, तसेच टॉमेटो, सोयाबीनपासून उपपदार्थ बनवणार आहे. त्यादृष्टीने कारखान्याचे सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाऊल टाकत साखर उद्योग सिझनल न राहता बारमाही उद्योग म्हणून चालवण्यासाठी पुढाकार घेत आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी कारखान्याला उसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article