सीताबाई महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन:मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त, आता संशोधनाची जबाबदारी आपली- डॉ. अशोक सोनोने

2 hours ago 1
‘संत तुकाराम यांचे अभंग अनमोल असून केवळ मराठीत लिहिले असल्यामुळे त्याला साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला नाही. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, आता संशोधन करण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार तथा ग्रंथपाल डॉ. अशोक सोनोने यांनी व्यक्त केले. येथील दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी डॉ. अशोक सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. भास्कर धारणे होते. संस्थाध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, मानद सचिव डॉ. पवन माहेश्वरी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. प्रा. दीपाली सोसे यांनी प्रास्ताविकामधून मराठी वाङ्मय मंडळाच्या उज्ज्वल आणि समृद्ध परंपरेला उजाळा दिला. तसेच मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषकांची प्रत्येकाची जबाबदारी वाढली असल्याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. डॉ. अशोक सोनोने यांनी सुरुवातीला मराठी वाङ्मय मंडळाची कार्यकारिणी घोषित केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्त्व, भाषेची समृद्धी, ग्रंथालयाचे महत्त्व आणि सीताबाई महाविद्यालयातील समृद्ध ग्रंथालयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. २०२४-२५ च्या या वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष म्हणून शीतल बलखंडे, सचिव शुभांगी दामोदर, प्रसिद्धीप्रमुख श्रद्धा यादव आणि दिपाली ठाकरे तसेच सदस्य, फारेहा उरुज, रामेश्वर अगुलदरे, मारूती गारोळे, शेख मुजीब शेख नजीर, वैभव गोंडाणे यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी शीतल बलखंडे हिने तर आभार सुयश फडणीस याने मानले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. कैलास वानखडे, डॉ. एच. एन. नरेटी, डॉ. सविता रेखे, प्रा. अर्चना बोंडे आदी प्राध्यापक तथा एम. ए. आणि बीएचे मराठी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. फक्त गुण मिळवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपन्न व्हावे प्रा. भास्कर धारणे यांनी वाङ्मय मंडळाचे महत्व विशद केले. या वाङ्मय मंडळाच्या सक्रिय कार्यपद्धतीमुळे अनेक विद्यार्थी, लेखक, संपादक, पत्रकार आणि सूत्रसंचालक म्हणून वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असल्याचे नमूद केले. महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाला अनेक वर्षांची परंपरा असून, या मंडळामार्फत केलेले कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. वाचन, लेखन, वक्तृत्व सूत्रसंचालनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून विद्यार्थ्यांनी फक्त गुण मिळवण्याऐवजी ज्ञानसंपन्न होण्याचा संदेश दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article