हरियाणाच्या निकालाचा ‘नो इफेक्ट’;काँग्रेस 115 जागांवर लढण्यावर ठाम:सोमवारी दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांचा निर्धार

3 days ago 3
हरियाणातील निकालामुळे महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे, जागावाटपात दोन पावले मागे घेण्याची तयारी राहुल गांधी यांनी दाखवली आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. उलट उद्धवसेनेपेक्षा किमान २० जागा जास्त लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. ११५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. तेथून परतल्यानंतर संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यात ११५ जागांची तयारी सुरू झाली. काही उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. प्रचारात पिछाडी टाळण्यासाठी उमेदवारांना तयारीस लागण्याचे गुप्त संदेश एक-दोन दिवसात देण्याचेही या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेचा निकाल आणि सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेत काँग्रेसने ११५ जागांवर दावा केला होता. आॅक्टोबरच्या प्रारंभी मविआची जागावाटप बैठक झाली. त्यातही हाच मुद्दा मांडण्यात आला होता. हरियाणाच्या निकालानंतर उद्धवसेनेने काँग्रेसवर हल्लाबोल केला. जास्त जागा आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी पुन्हा मागणी केली होती. सूत्रांनी सांगितले की, शरद पवारांंनी खासदार संजय राऊत यांना योग्य शब्दात समज दिल्यावर उद्धवसेनेने दोन्ही मागण्यांवरून माघार घेतली आहे. सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात दिल्लीत राहुल गांधींना भेटून आले. त्याविषयी सूत्रांनी सांगितले की, २१० जागांवर मविआतील तीनही पक्षांचे एकमत झाले असले तरी अद्याप राज्यातील सर्वच विभागातील जागांवर एकमत झाले नाही. म्हणून उमेदवारांना प्रचारात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परिणामी सावधगिरी म्हणून काँग्रेसने अशा सक्षम उमेदवारांवर सोमवारी बैठकीत चर्चा केली. त्यापैकी तिकीट मिळणाऱ्या उमेदवाराला प्रचारास लागण्याचे निरोप देण्यात येणार आहेत. भाजपची १०० नावांची यादीही तयार; शाहांसमोर सादरीकरण हरियाणा निकालाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने १५० ते १६० जागांवरच लढण्याचे ठरवले आहे. निश्चित केलेल्या १०० उमेदवारांविषयी महाराष्ट्र भाजप कोअर समितीने दिल्लीत अमित शाह यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर ते मुंबईत परत आले. मंगळवारी मुंबईत दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्यात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोअर समिती बैठकीविषयी सांगितले की, २८८ विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीची समन्वय समिती निर्माण केली आहे. विद्यमान आमदारांची तिकिटे मोठ्या प्रमाणात कापली जाण्याची चर्चा काल्पनिक आहे. कारण, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतरच खरी परिस्थिती कळेल. एका मतदारसंघात दोघांची नावे काँग्रेसकडे १७०० जणांनी अर्ज केले आहेत. एका मतदारसंघात दोन उमेदवार अशी यादी तयार झाली आहे. बहुतांश विद्यमान काही माजी आमदार आणि नव्या चेहऱ्यांचा यादीत समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article