7000 हून अधिक लाडक्या बहिणी दाखल्यांअभावी योजनेपासून वंचित:सही करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली अन् मंत्र्यांच्या दौऱ्याचे दिले कारण
2 hours ago
1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत सोमवारी (दि. ३०) संपली आहे. मात्र, योजनेचा अर्ज भरण्यासाठी मागीलदोन महिन्यांपासून महा-ई-सेवा केंद्रातउत्पन्नाच्या दाखल्यांसह रेशन कार्डसाठीचकरा मारणाऱ्या ७००० महिलांना शेवटच्या दिवशीही दाखले न मिळाल्याने त्यांनायोजनेपासून वंचित राहावे लागले. याबाबतइतर अधिकाऱ्यांची वारंवार हाेणारी बदली आणि आलेले अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यांच्या अतिरिक्त कामांत असल्याने त्यांना प्रलंबित दाखले निकाली काढण्यास वेळच मिळत नसल्याचे कारण देण्यात येते. दुसरीकडे शैक्षणिक कामासाठी व विशेष करूनमागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीलागणाऱ्या नॉन क्रिमीलेअर, ईडब्ल्यूएस,डोमेसाइल जातीचे, उत्पन्नाचे दाखले प्रलंबितराहिल्याने ३००० विद्यार्थ्यांचीही विविध कामेरखडली असल्याचे सेतू केंद्र चालकच सांगतआहेत. जुलै महिन्यात लाडकी बहीण याेजनेत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर राज्यशासनाने संकेतस्थळही कार्यान्वित करूननिकषही शिथिल केले हाेते. याचा फायदाघेताना महिलांना उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड आणि इतर दाखल्यांची गरज असतानात्यासाठी महा-ई-सेवा केंद्रातहीमहिलांनी अर्ज केले. दीड-दाेन महिनेउलटूनही महिलांना अद्याप कागदपत्रचमिळाली नसल्याने आणि आतायाेजनेत अर्ज करण्याचा कालावधीसंपल्याने शहरातील २०० वरमहा-ई-सेवा केंद्र व कॉमन सर्विससेंटर येथे जवळपास सात हजारांवरमहिला वंचित राहिल्या आहेत.दुसरीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्याविद्यार्थ्यांसाठी असलेल्याशिष्यवृत्तीसाठी लागणारा जातीचादाखला, नॉन क्रिमिलेअर, उत्पन्नाचादाखला काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीदाखल केलेले तीन हजारहून अधिक अर्ज प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे.काही दिवसांपासून आपले सरकार हेसंकेतस्थळही डाऊन हाेत असल्याचाफटका सेतू केंद्रांना बसत असल्याचे चालक सांगतात.
सोमवारपासून लाडकी बहीण योजनेचे नवीनअर्ज भरण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. आताज्यांनी अर्ज भरले आहे ते अपडेट हाेतील. ज्यामहिलांनी कागदपत्रांअभावी अर्ज केलेला नाही,त्यांनी आता शासनाच्या सूचनांची वाट पहावी. -सुनील दुसाने, महिला व बाल विकास अधिकारी लाडकी बहीण योजनेसह काही दाखलेकलेक्टर ऑफिसमध्ये मंजुरी अभावीअडकलेले असून यात सर्वाधिकउत्पन्नाचे दाखले प्रलंबित आहे. लाडकीबहीण योजनेची अर्जाची मुदत संपल्यानेआता महिलांकडून केंद्रावर गाेंधळघातला जाताे. काय उत्तर द्यावे. - महा -ई- सेवा केंद्र चालक संबंधितांना सूचना केल्या जातील महा-ई-सेवा केंद्रातून प्राप्तदाखल्यांच्या अर्जाबाबत माहितीघेऊन ते तातडीने निकाली काढण्यासंदर्भात सूचना करणार .-भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)