Published on
:
12 Oct 2024, 10:20 am
Updated on
:
12 Oct 2024, 10:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क :महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी या कलाजगतात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन ते राजेश खन्ना यांच्यानंतर सुपरस्टार बनले आहेत. त्यांच्यात इतकी ऊर्जा आहे की, ते अजून अभिनगात कार्यरत आहेत.
सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ ते कलाविश्वात सक्रिय आहेत. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) अमिताभ यांनी त्यांचा ८२ या वाढदिवस साजरा केला. याचदरम्यान, अमिताभ यांच्या एका सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. एका मुलाखतीत आनंद पंडित यांनी याचाबत खुलासा केला आहे.
ते म्हणाले, हा चित्रपट म्हणजे अशा व्यक्तीची आहे की, ज्याच्याकडे काहीही नसताना तो शहराची वाट धरतो आणि स्वतःचे अनोखे विश्व निर्माण करतो. तो सिनेमा म्हणजे, त्रिशूल सिनेमा होय. या सिनेमाचा सिक्वेल 'त्रिशूल-२' या सिनेमात विजयचा प्रयास दाखवला जाणार आहे. जर त्रिशूल-२' या सिनेमाची निर्मिती केली, तर अमिताभ आणि मी पाचव्यांदा एकत्र काम करताना दिखणार आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित चाहत्यांना गोड भेट मिळाली आहे. आता चाहते त्रिशूल-२' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा हा सिनेमा पाहण्यास मिळतो याची उत्सुकता ताणली आहे.