हिंगोलीत घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने ठराव
हिंगोली (Dam victims Andolan) : आज इसापूर,सिध्देश्वर, येलदरी या तीनही धरणांतील पीडीत धरणग्रस्त बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ८ ऑक्टोंबरला आंदोलन करण्याचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील ईसापूर धरण, सिध्देश्वर धरण आणि येलदरी धरणामुळे संपूर्ण जिल्ह्याच विस्थापित झाला आहे. या कारणामुळे हिंगोली येथे धरणग्रस्तांची २ ऑक्टोंबर २०२३ रोजी (Dam victims Andolan) धरणग्रस्त हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत हिंगोली जिल्ह्यातील इसापूर, सिध्देश्वर,येलदरी धरणग्रस्तांची गावनिहाय वर्तमान सालची सामजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक परिस्थीती काय आहे ती जाहीर करावी. यासह इत्यादी मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करून संबंधीत विभागाकडून चुकीची माहिती देण्यात आली. यासंदर्भात व नव्याने काही मागण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येईल तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ८ ऑक्टोंबर रोजी (Dam victims Andolan) आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
यावेळी अॅड. सचिन नाईक यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित धरणग्रस्त बांधवांनी अनेक प्रकारच्या व्यथा मांडल्या. यावेळी (Dam victims Andolan) धरणग्रस्त विकास संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष अॅड.रवी शिंदे, अॅड.दिपक नाईक, साहेबराव मस्के, वामनराव पोले, लिंबाराव थिटे दिलीपराव नाईक, बाजीराव मस्के, संतोष पोले, भारत चिलगर, मनिष सिरसाठ पतंगराव मस्के, गजानन वाघमारे,यादवराव थिटे, सुभाष क्षीरसागर, विठ्ठलराव मस्के, योगेश हुलगुंडे, सुंदरलाल जयस्वाल, उद्धव हराळ, मोहन चिलगर, अमृतराव चिलगर, शिवप्रसाद मस्के, भारत चिलगर, भास्करराव पोले, शंकरराव ढाले यांच्यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त बांधव उपस्थित होते.धरणग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने अनेक आंदोलनानंतर आक्रमक भूमिकाही घेतली जाणार आहे. सिद्धेश्वर, येलदरी व ईसापूर धरणातील पिडीत धरणग्रस्तांची व्यथा ही फार वेगळीच आहे. अॅड.सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आता या आंदोलनाला अधिक धार आली आहे.