सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी:बुद्ध लेणी बचाव महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

3 hours ago 1
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत असलेल्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील 60 ते 70 वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बुद्ध लेणी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय बुद्ध लेणी बचाव मोर्चाला एमआयएम नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. जगभरातील बौध्दांचे श्रध्दास्थान असलेल्या औरंगाबाद येथील बौध्द लेण्यांच्या सोबतच पायथ्याशी असलेल्या विपश्यना बुध्द विहार येथे मागील 60 ते 70 वर्षापासून बौध्द अनुयायी मोठ्या आदराने नतमस्तक होतात. परंतु, बौध्द अनुयायांच्या या उर्जास्थळास अतिक्रमण असल्याचे संबोधून मा. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 प्रमाणे नोटीस बजावली आहे. त्यामध्ये बुध्द विहार आणि बौध्द मूर्ती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक स्थळाला हटविण्याच्या मनुवादी भूमिकेच्या विरोधात आपण लेणी वाचवण्यासाठी आणि लेण्यांच्या विकासासाठी अहोरात्र कार्य करत आहात, त्या विरोधात लढत आहात ते कार्य अविस्मरणीय असल्याचे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या परिपत्रकात म्हणले आहे. इम्तियाज जलील म्हणाले, ऐतिहासिक बौध्द लेणी परिसरातील सोयीसुविधा व सुशोभीकरणाचे अनेक कामे हे माझ्या स्थानिक विकास निधी (खासदार निधी) मधून झालेले आहेत. सकाळी 11 वाजता, स्थळ क्रांतिचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद पर्यंत होणाऱ्या बौध्द लेणी बचाव मोर्चासाठी माझा आणि एआयएमआयएम पक्षाचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे. बौध्दांच्या अस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या लढ्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरीकांनी लाखोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव शाळा व महाविद्यालये यांना सार्वजनिक सुट्टी जिल्हा परिषद शिक्षणंधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळेला सुटी देण्याबाबत आपल्या स्तरावर विचार करण्यात यावा, असे देखील अधिकाऱ्यांनी शाळा व महाविद्यालय प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article