निलंगा(Latur):- निलंगा तालुक्यातील अनेक गावात तेरणा नदी वाहत असलेल्या नदिपात्रात शेजारील कोकळगाव, सांगवी, नदी हत्तरगा कामले वाडी, रामतीर्थ, मदनसुरी, लिंबाळा, दादगी,चिंचोली भंगार, येळणूर,सोनखेड, मानेजवळगा सावरी, आदीं शिवारात पावसाने मंगळवारी दुपारनंतर थैमान घातले होते. मुसळधार पावसाने (Rain)तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे (soybeans) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील तेरणा परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह तुफान मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेे. मदनसुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह तुफान पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला
यामुळें शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व इतर पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी(Farmer) वर्ग करत आहे. जवळपास अडीच तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे.