मनोज जरांगे पाटील यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालला, तो राज्यात कसा चालेल असा असा उलट सवाल केला आहे. नारायणगडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे, त्यापूर्वीच त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारं वक्तव्य केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं आहे. राज्यात ठिकठिकाणी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जागर सुरू असताना त्यात आता नारायणगडावरील दसरा मेळाव्याची भर पडणार आहे. या मेळाव्याच्या तयारीपूर्वीच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालला, तो राज्यात कसा चालेल असा असा उलट सवाल केला. आता तुम्ही सगळे पडणार, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
सविस्तर बातमी थोड्याचवेळात…