Gadchiroli: ‘अपघात विमा’ खचलेल्या कूटूंबाला जगण्याचे बळ देते..

2 hours ago 1

Gadchiroli:- अपघात ही अप्रिय व कटू घटणा असली तरी अनेकाना नकळत हा आघात सहन करावा लागतो ,अनेक कूटूंब अपघातामूळे (Accidents) उध्वस्त होतात घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने मोठी विवंचना त्यांचा समोर असते यावेळी अपघात विमा हा जिवन परत मीळवून देऊ शकत नसला तरी उध्वस्त कूटूंबाला जगण्याचे बळ मात्र निश्चित देतो त्यामूळे सगळ्यानी शाशन पूरस्कृत अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यानी केले .

मृतक मनिष लोहबंरे यांचा कूटूंबाला १० लाखाचा अपघात विमाचा धनादेश प्रदान

मागील दोन महिण्यापूर्वी कूरखेडा – वाकडी मार्गावर मनिष यादवराव लोहबंरे वय २५ या यूवकाचा रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कूटूंबावर मोठा आघात झाला होता. मृतकाने केंद्र शाशन पूरस्कृत भारतीय पोस्ट विभागाचे वार्षिक ३९९ रूपयाची अपघात विमा पालीसी घेतली होती. विभागाद्वारे त्यांचा अपघात विमा दावा मंजूर करण्यात आला व त्याचा कूटूंबाला येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात (BJP Public Relations Offices) आयोजित कार्यक्रमात १० लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भारतीय पोस्ट विभागाचे विभागीय व्यवस्थापक कैलाश काकडे कूरखेडा शाखा व्यवस्थापक अभय किरकटे कर्मचारी उमेश धमगाये, रमन राज, वैभव भावसार, नारायण आदमपूरे, अमोल पवार, लोकेश हटवार, मृतकाचा भाऊ छगन लोहबंरे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकूसरे शहर अध्यक्ष सागर निरंकारी तालुका महामंत्री प्रा विनोद नागपूरकर आदि हजर होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article