कित्तूर : विकामकामांचा प्रारंभ करताना मंत्री कृष्णा ब्यायरेगौडा. शेजारी आमदार बाबासाहेब पाटील, राजयोगिंद्र महास्वामी, पंचाक्षरी महास्वामी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद, प्रांताधिकारी रविंद्र रावजी आदी.Pudhari
Published on
:
09 Oct 2024, 1:16 pm
Updated on
:
09 Oct 2024, 1:16 pm
बेळगाव : कित्तूर किल्ल्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. किल्ल्याचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याची योजना आखण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ३० कोटींच्या अनुदानातून थीम पार्क व इतर कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा व्यायरेगौडा यांनी दिली आहे. कित्तूर विकास प्राधिकरण आणि पुरातत्व विभाग म्हैसूर यांच्यावतीने कित्तूर किल्ल्याच्या आवारात मंगळवारी (दि. ८) भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले, किल्ल्याचे प्रवेशद्वार, भिंतीसह विविध अवशेषांचे जतन करण्यासाठी २.११ कोटी आणि २.४ कोटी रूपये इतर कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापासून या भागातील आमदारांची मागणी होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गडाच्या विकासासाठी तातडीने अनुदान मंजूर केले आहे. किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंतींचे नूतनीकरण करून इतिहास जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
१२.११ कोटी अनुदानातून विविध अत्यावश्यक कामांची दुरुस्ती आणि जतन करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. पुरातत्व विभागाच्या सहकायनि किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या आहेत. मूळ प्रणालीनुसार दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार चाबासाहेब पाटील, कित्तूर संस्थान कलमठचे राजगुरु मडिवाळ राजयोगिंद्र महास्वामी, पंचाक्षरी महास्वामी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद, कित्तूर विकास प्राधिकरणाचे आयुक्त व प्रांताधिकारी रविंद्र रावजी आदी उपस्थित होते.