Parbhani:- परभणीतील देऊळगाव येथे मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी उपोषण करून, सभा घेऊन, गाव तीथे साखळी उपोषण, अमरन उपोषण, बेमुदत साखळी उपोषण, भव्य दिव्य अशा मोटार सायकल रॅली ने राज्य सरकार व केंद्र सरकार (Central Govt) यांचे लक्ष मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष वेधले असुन जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले असून सरकारने त्यांच्या उपोषणाचे अद्याप दखल घेतलेली नाही त्यामुळे त्यांच्या उपोषणास व त्यांना पाठींबा देण्य्यासाठी व मराठा बांधवाना या आरक्षण आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी काजळी रोहीना येथील मराठा आंदोलक ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा गाव तीथे किर्तन या उपक्रमातून सुरूवात केली आहे.
मराठा समाज बांधव तसेच गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित
तसेच मराठा आंदोलक पांडूरंग कदम यांचे ही गाव तीथे व्याख्यानाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचे विचार मांडत आहेत. दि.१८ पासून या कीर्तन व व्याख्यान मोहिमेस सुरवात झाली असुन तालुक्यातील देऊळगाव गात येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी किर्तनाच्या व व्याख्यानांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचे विचार मांडण्यात आले असून प्रसाद महाराज काष्टे यांनी आपल्या कीर्तनातून सांगतात की जातीसाठी काम करणे हा कधीच जातीवाद नाही पण दुसऱ्या जातीचा द्वेष करणे हा जातीवाद
असून दररोज २ गाव २ किर्तन होणार आहेत तसेच शेवटी काल्याचे किर्तन होणार असुन त्या कीर्तनास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित राहाणार आहेत अशी माहिती मराठा समाजाच्या वतीने संयोजक ह.भ.प.प्रसाद महाराज काष्टे व पांडूरंग कदम यांनी दिली. या कीर्तनास देऊळगाव गात येथील सकल मराठा समाज बांधव तसेच गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते कीर्तनानासाठी माऊली महाराज खवणे गायण तर मृदंगचार्य राम महाराज गोरे यांनी साथ दिली.