क्रीडामंत्री बनसोडे यांचे यश
उदगीर (Udgir Dairy) : शहरातील शासकीय डेअरी भंगारात निघाली असल्यामुळे उदगीरकरांचा मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला होता. दरम्यान, उदगीरकर मंडळींनी धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून महाराष्ट्र सरकारने भंगार प्रक्रिया रद्द केल्याची माहिती मिळत आहे. सदरील प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी संबधीत खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून सदरील प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या मध्यस्थीला यश आले असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तर, लवकरच मंत्रालयात ‘एनडीडीबी’ सोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हाती लागली असून (Udgir Dairy) डेअरी पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले असल्याचे चित्र आहे.
बनसोडे यांना फायदाच…
फक्त पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार होते. त्यात, (Udgir Dairy) डेअरी भंगारात निघाली असल्याने त्यांच्यावर नागरिकांचा रोष दिसून येत होता. वेळीच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ त्यांनी संबधीत खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदरील प्रश्नावर यशस्वी तोडगा काढला आहे. त्यामुळे, याचा फायदा संजय बनसोडे यांना होणार असून त्यांच्या विरोधात बनत असलेले वातावरण निवळण्याची शक्यता आहे.
देशोन्नतीच्या पाठपुराव्याला यश…
डेअरी भंगारात (Udgir Dairy) निघाल्याची माहिती मिळाल्यापासून ते आजपर्यंत दैनिक देशोन्नतीने डेअरी वाचविण्यासंधर्भात सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. बातमी छापल्यामुळे कुणालातरी दुःख होईल याचा विचार न करता हजारो शेतकऱ्यांची बाजू घेतली होती.