अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर पोलिस चालत-चालत रुग्णालयात गेले:शिंदेला शाळेतील काही गुपित माहिती होते का?- जितेंद्र आव्हाड

2 hours ago 1
अक्षय शिंदे याला प्रकरणातील अधिकची माहिती होती का?, त्या शाळेच्या किती ट्रस्टींना अटक करण्यात आली. ज्या पोलिसांना गोळी लागली ते चालत चालत रुग्णालयात गेले असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर लैंगिक अत्याचार प्रकरणातील बड्या धेंडांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला, असेही बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, अक्षय शिंदेला मारण्यासाठी जी युक्ती लढवली आहे. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. खरे तर याप्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय? शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच 3 गोष्टी घडल्या. 1. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर 2. पोलिसांवर दबाव 3. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न या सगळ्या नंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे. हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा..! विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही आहोत. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत Political Heroism आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे. महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही. न्यायव्यवस्थेचा अपमान जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा Encounter घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे..! संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कायदा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच आहे, पण कायद्याचा गैरवापर जेव्हा केला जातो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुणी म्हणतंय की अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला, कुणी म्हणतंय की पोलिसांनी एन्काऊंटर केलं... आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस काय करत होते? पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कुणी दिले? गोळ्या कुठे लागल्या? हे प्रकरण संशयास्पद असून याची न्यायिक चौकशी व्हायलाच हवी.पण त्यासोबतच, महत्त्वाचं म्हणजे, निवडणुका तोंडावर असताना अशा हिंसक व न्यायविरोधी घटना घडवून आणून लोकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत गंभीर आहे.या प्रकरणात नक्की काय लपवलं जातंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article