अन्न नासाडी कमी करणे हे अन्न सुरक्षा, पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक:अन्न नासाडी, अपव्यय रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय जनजागृती दिन साजरा‎

2 hours ago 1
अन्न नासाडी कमी करणे हे अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक असल्याचे मत कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी व्यक्त केले. दरवर्षी उत्पादित केलेल्या एक तृतीयांश अन्नाचा नाश होतो किंवा तो वाया जाते, असेही ते म्हणाले. अन्न नासाडी आणि अपव्यय रोखण्याच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय जनजागृती दिवसानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. काळबांडे बोलत होते. कार्यक्रम कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाद्वारे पार पडला. २९ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी आणि अपव्यय रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कृषी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अन्न वाया जाऊ नये, पण नाईलाजाने गेलेच तर बायोगॅस प्लांटमध्ये ते टाकून ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, याकडे लक्ष वेधले. अन्न नासाडी कमी करणे हे अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक असल्याचे डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी स्पष्ट केले. या विभागाने विविध कापणी पश्चात तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून बरेच प्रमाणात पिकांची कापणी पश्चात हानी कमी करता येते. प्रास्ताविक डॉ. प्रमोद बकाने यांनी केले. जगभरात दरवर्षी एकूण अन्नाच्या ३० ते ४० टक्के नासाडी होते, याकडे लक्ष वेधले आणि अन्न नासाडी कमी करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. दरवर्षी उत्पादित केलेल्या एक तृतीयांश अन्नाचा नाश होतो किंवा तो वाया जातो. याची किंमत अंदाजे १ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स आहे. अन्नाचे नुकसान आणि अपव्यय कमी करणे हे संसाधनांची बचत, हवामान बदलाचा सामना, अन्न सुरक्षा वाढवणे आणि अन्नाची किंमत कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. २०२२ मध्ये ७८३ दशलक्ष लोक उपासमारीचा सामना करत होते, तर ३.१ अब्ज लोकांना पुरेसा आहार मिळत नव्हता, अशी माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाला विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य . मोरेश्वर वानखडे आणि कृष्णा अंधारे आदी होते. निबंध स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात अन्न नासाडी रोखण्यासाठी उपाययोजना या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. वासुदेव मते यांनी केले. कार्यक्रमाला कृषी अभियांत्रिकी शाखेतील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article