अमरावतीमध्ये भूकंप, दुपारी अचानकच हादरे बसले:कामे सोडून नागरिक घराबाहेर, जिल्ह्यात कुठेही नुकसान नाही, घरातील भांडी खाली पडली

2 hours ago 1
जिल्ह्यात सोमवारी (दि. ३०) दुपारी दीडच्या सुमारास धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व तिवसा या सहा तालुक्यांना भुकंपाचे धक्के बसले. त्यामुळे काही क्षण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी १ वाजून २७ मिनिटांच्या आसपास घरात असलेल्या नागरिकांना अचानकच हादरे बसले, त्यामुळे अनेकांनी हातची कामे टाकून घराबाहेर धाव घेतली. काही वेळानंतर त्यांना कळले हा भुकंपाचा धक्का होता. या घटनेमुळे जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही. दरम्यान या धक्क्यांमुळे काही घरातील भांडे वरुन खाली पडले. अंजनगाव तालुक्यात भीतीचे वातावरण साधारण दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील काही गावामध्ये भुकंपाचे धक्के बसत असल्याचे नागरिकांना लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ४.२ भुकंपाचा सौम्य धक्का बसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दुपारच्या सुमारास नागरिक उर्वरित, पान ४ ^भुकंपाचे नेमके कारण तर अभ्यासाअंतीच सांगता येईल. मात्र प्राथमिक अंदाजानूसार, यंदा जिल्ह्यात विशेषत: मेळघाटात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. पाऊस जास्त प्रमाणात जमिनीत मुरल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये असलेल्या दगड किंवा खडकाची जागा बदलू शकतात. मेळघाटचा पहाड टनक दगडात आहे मात्र सदर भुकंपाची खोलीवरील तीव्रता १३ किमी असल्याचे ‘नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजिकल’ यांच्या रीपोर्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आतमध्ये नेमका दगड कसा आहे. हे सांगता येणार नाही. मात्र सततच्या पाण्यामुळे धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. - प्रा. डॉ. मयुरा देशमुख, भुगर्भशास्त्र विभागप्रमुख, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती. जमीन हलल्याचा भास झाल्याने आई पडली ^ज्या वेळी भुकंपाचे धक्के बसले, त्या वेळी माझी आई, सुनंदा आवंडकर स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. अचानक घरातील फळीवरील भांडे खाली पडले. त्यातच जमीन हलल्याने आईदेखील खाली पडली. परंतु, हा धक्का सौम्य तसेच काही क्षणाचा असल्याने तिला कुठेही दुखापत झाली नाही. - चेतन आवंडकर , अंजनगाव. तिवसा शहरात नागरिकांत भितीचे वातावरण शहरातील पंचवटी परीसरातील डागा कॉम्पलेक्स परिसराच्या मागील भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही क्षण काय झाले हे नागरिकांना कळले नाही. मात्र बसलेले धक्के भुकंपाचे असल्याचे कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article