अरबी समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी निघाले संभाजीराजे:म्हणाले - केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही

2 hours ago 1
संभाजीराजे भोसले यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला असून निवडणूक आयोगाने नुकतेच त्यांच्या पक्षाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजीराजे अॅक्शन मोडमध्ये आले असून ते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. सरकारने आठ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी निघाले आहेत. या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे, मग स्मारक का होत नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. माझा कुणालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाही संभाजीराजे म्हणाले की, मुंबईतील अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक शोधणार आहे. मी पाच वर्ष खासदार असताना यासाठी पाठपुरावा केला होता. ही माझी राजकीय भूमिका नाही. गडकोट किल्ल्यांची अवस्था वाईट आहे. माझा कुणालाही कोंडीत पकडण्यावा प्रयत्न नाही, असे संभाजीराजी यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांनी स्मारकाबाबत एकच उत्तर दिले संभाजी राजे म्हणाले की, स्वराजय पक्षाची नुकतीच नोंदणी झाली असून प्रतिकात्मक आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मी 15 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. 2016 मध्ये शिवस्मारकाच्या जलपूजनावेळी मी देखील हजर होतो. त्यावेळी मोदींचे कौतुकही केले. स्मारकासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत विचारणा केली, मात्र सर्वांनी प्रकरण कोर्टात अडकले आहे, एवढे एकच उत्तर दिले, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले. सरकारने 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरावर संभाजी राजे यांनी सरकारला सवाल केला आहे. त्यावेळी सर्व परवानग्या असल्याशिवाय पंतप्रधानांना जलपूजनासाठी बोलावणे चुकीचे आहे. पुढे निवडणुका होत्या म्हणून घाईघाईत जलपूजन केले का? असे संभाजीराजे म्हणाले. कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले गेले. मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारक शोधण्यासाठी मोहीम काढली आहे. सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असेही ते म्हणाले. आम्हाला घेऊन जाणाऱ्या बोटीवाल्यांना धमक्या संभाजी राजे म्हणाले की, आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु, ज्या बोटीने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना तुमचा बोटीचा परवाना रद्द करु, अशा सरकारकडून धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप संभाजी राजे यांनी केला आहे. मात्र आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही जिथपर्यंत परवानगी आहे तिथपर्यंत जाणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले आहे. मोदींनी महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे संभाजी राजे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चूक होत आहे. त्या ठिकाणी परवानग्या नव्हत्या तर मग ते आले का? ८ वर्षांपासून काहीच काम झाले नाही. माझ्या हस्ते जलपुजन करूनही काहीच काम का केले नाही, असे मोदींनी महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे. राज्यातील जनतेचीही फसवणूक केली आहे. आज आम्ही शिवरायाचा स्मारकाचा मुद्दा घेतला आहे. पण इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल पण हीच भूमिका आहे. नेमके प्रकरण काय? भाजप आणि शिवसेना सरकारने डिसेंबर 2016 मध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करुन अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. शिवस्मारकाच्या जलपूजनाला काही दिवसांत आठ वर्षे पूर्ण होतील, पण महाराजांच्या स्मारकाचे काम काही सुरू झाले नाही. त्यामुळे स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी चला, शिवस्मारक शोधूया असे म्हणत सरकारविरोधात पहिली मोहीम काढली आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article