आमदार इंद्रनील नाईकांना वाशिमच्या कार्यक्रमातून डावलले:मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही; जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा

2 hours ago 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांना वगळण्यात आले आहे. त्यांना डावल्यामुळे इंद्रनील नाईक हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांना जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाली आहे. इतकेच नाही तर भाजपचे माजी आमदार निलय नाईक यांना देखील शासकीय निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या या दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष विदर्भातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या दौऱ्यात आता अजित पवार गटाला डावलण्यात आल्यामुळे या कार्यक्रमामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्यास दिसून येत आहे. यात इंद्रनील नाईकांना जाणीवपूर्वक डावलल्याची चर्चा आहे. भाजपचे माजी आमदार निलय नाईकांनाही शासकीय निमंत्रण नाही. त्यामुळे आता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे कार्यक्रम विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते राज्यभरातील सुमारे 56 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ, पायाभरणी करतील. यात विदर्भातील वाशिम येथे मोदींचे कार्यक्रम होणार आहेत. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत-ए - बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण मोदी करतील. वाशिममध्ये मोदी 23,300 कोटींच्या कृषी व पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. याच वेळी पंतप्रधानाकडून शेतकरी सन्मान निधीचा 18 वा हप्ताही वितरित केला जाणार आहे. मात्र, या सर्वांत अजित पवार गटातील नेत्यांना दूर ठेवल्यामुळे याची चर्चा रंगली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... राज्यात NIA आणि ATS ची मोठी कारवाई:छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून तरुण ताब्यात; देश विघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा संशय महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांचा समावेश देश विघातक कृत्यांमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा देखील या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा... तिसऱ्या आघाडीमुळे माझी झोप उडाली, आता आमचे कसे होणार?:शरद पवार यांचा संभाजीराजे छत्रपतींना टोला; भयंकर अस्वस्थ असल्याचे म्हणत उडवली खिल्ली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. मात्र यातच राज्यांमध्ये परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा या तिसऱ्या आघाडीत समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल, माझी तर झोप गेलीये, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. अशा शब्दात पवारांनी या तिसऱ्या आघाडीला टोला लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article