इथेनॉलबाबत केंद्र शासनाने योग्य धोरण घेणे गरजेचे- विवेक कोल्हे:आमदार काळे यांनी कोपरगावकरांची दिशाभूल केली

2 hours ago 1
सहकारमहर्षी शंकराराव कोल्हे साखर कारखान्याने मागील वर्षी ७ लाख ९ हजार टन गाळप केले. तसेच ८६ हजार मेट्रीक टन इथेनॉल निर्मिती केली. शासनाचे अचानक धोरण बदलून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली. त्यामुळे इथेनॉल निर्मिती थांबवावी लागल्याने कारखाना आर्थिक अडचण झाली. दीड कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता असताना अर्धे इथेनॉल टाकीत पडून होते. आता शासनाने योग्य धोरण घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यास्थळावर पार पडली. यावेळी ते बोलत होते. संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपीन कोल्हे, अरुण येवले, विश्वास महाले, बापूसाहेब बाराहते, बाबासाहेब नरोडे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर परजणे आदींसह शेतकरी उपस्थित होते. विवेक कोल्हे म्हणाले, कारखानदारीत जिल्ह्यात स्पर्धात्मक युग असताना देखील कोल्हे कारखान्याद्वारे एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना अदा केली. ऊस वाहतूक खर्चात ३४ टक्के वाढ झाली. त्याचाही फटका कारखान्याला बसला आहे. साखरेच्या उत्पन्नात घट झाली. तालुक्यात ९३४ शेततळे आहेत. त्यामध्ये मत्स्यशेती पालन संस्था स्थापन केली. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. काही नेते आता उठतात व त्यांचे तेवढे वय नाही, तरी ते कोल्हे साहेबांचे काम विचारतात. स्व.कोल्हे यांनी मुकणे, भाम, भावली, कश्यपी यासारखी धरणे अबाधित ठेवली. त्याचे पाणी मिळवून दिले. त्यामुळे त्यांना जनतेने ३५ वर्ष निवडून दिले. तुम्हाला पाहिल्यांदा निवडून दिल्यावर तुम्ही तालुक्याचे पाणी घालवून तालुक्याचे नुकसान केले. तुम्ही कितीही तळे बांधा त्याचा काहीही उपयोग नाही. तालुक्यात ३ हजार कोटी आले आहेत, असा कांगावा लोकप्रतिनिधी करत आहे. तर त्याप्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावाला ३० कोटी आले पाहिजे होते. मात्र कोणत्याही गावाला ३० कोटी आले नाही. हा विकास फक्त फ्लेक्सवर आहे. असा विकास जनतेला नको. आता कोपरगावकर लोकप्रतिनिधी काहीच केले नाही म्हणून फसवणुकीचा दावा दाखल करणार आहेत. आमदार काळे फक्त जनतेची दिशाभूल करून तालुक्याचा बट्याबोळ करत असल्याची टीका देखील विवेक कोल्हे यांनी केली. कारखाना सीएनजी निर्मिती करणार पाऊस कमी झाल्यामुळे उसाची कमतरता भासणार आहे. ऊस पळवापळवी होणार आहे. कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढवावी लागेल. आगामी काळात सीएनजी निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहोत. मक्यापासून अल्कोहोल किंवा रिक्टिफाईड स्पिरिट तयार करण्यासाठी कोल्हे कारखाना प्रयत्नशील आहे, असे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article