कृषी विद्यापीठामध्ये अविष्कार स्पर्धा:विद्यापीठ प्रक्षेत्रातील 9 महाविद्यालयांच्या 36 विद्यार्थ्यांचा सहभाग

2 hours ago 1
राज्यपाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ’अविष्कार’ ही संशोधनपर स्पर्धा ४ ऑक्टोबरला डॉ. देशमुख कृषि विद्यापीठात झाली. त्यात विद्यापीठ प्रक्षेत्रातील नऊ महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला नऊ महाविद्यालयांचे संघ व्यवस्थापक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संशोधन याबद्दलचा ध्यास निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक गुणवत्तेला वाव मिळावा, या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाचे मुख्यालय येथे केले स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. ययाती तायडे, डॉ.शैलेश हरणे, कुलगुरू यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, डॉ.संदीप हाडोळे, डॉ. अभय वाघ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविका डॉ. तायडे यांनी केले. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विद्यार्थ्यांना चौकस बुद्धीने कार्य करण्याचे नमूद केले. समाजातील सर्वच घटकांपासून शिकण्यासारखे असून त्याचा चौकस बुद्धीने अभ्यास केल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी चालना मिळू शकते याबद्दल उदाहरणांचा संदर्भ देत मार्गदर्शन केले. डॉ.सुरेंद्र काळबांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.श्यामसुंदर माने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छोटीशी संकल्पना सुद्धा कसं मोठं रूप घेऊ शकतं याचे उदाहरणे देत कल्पनाशक्तींना प्रेरित करण्याचे आवाहन केले. विद्यापीठांमध्ये उपलब्ध स्त्रोतांचा उपयोग करून नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अविष्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कोंडे यांनी केले. डॉ. अभय वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमा साठी डॉ. दारासिंग राठोड , डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. मृदुलता देशमुख ,डॉ. उज्ज्वला शिरसाट, डॉ. शेगोकार, डॉ. योगेश इंगळे, डॉ. उपेंद्र कुलकर्णी तसेच एम एस सी आणि पी.एचडी.च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड ः अविष्कार कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध संशोधनपर पैलूंवर भित्तीपत्रके ,मौखिक सादरीकरण तथा विविध देखाव्यांद्वारे नाविन्यपूर्ण संशोधनाची दिशा दर्शविली. सदर अविष्कार स्पर्धेदरम्यान झालेल्या विविध सादरीकरणांमधून काही नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली निवड समिती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article