गडकरी, फडणवीसांसह बावनकुळेंना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलंय:जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारास गेले तिथे भाजपचे नुकसान- विजय वडेट्टीवार

2 hours ago 1
अमित शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात याचा अर्थ भाजपचे पाय खोलात गेला आहे. कितीही प्रयत्न केला तरी ते आता बाहेर काढू शकत नाहीत. मोदी शहा जितक्या वेळा महाराष्ट्रात, विदर्भात येतील तितकं भाजपचे नुकसान होणार आहे.मोदी जिथे गेले तिथे भाजपचे नुकसान झाले, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला निवडून आणायचे ठरवलेले आहे. मोदी चंद्रपूर, भंडारा गोंदियात गेले तिकडे पराभव झाला. नशीब ते नागपूरला नाही आले नाही तर गडकरी हरले असते. सरकारला लाडकी बहिण नाही सत्ता विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या डोक्यात होत ते आमदारा टेकचंद सावरकरांच्या मुखातून बाहेर पडलंय असा टोला त्यांनी लगावला आहे. तर सरकारला लाडकी बहीण नाही लाडकी सत्ता आहे,हे स्पष्ट झाले. माझा लाडका मतदार आहे हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून स्पष्ट झाल्याने सत्ताधाऱ्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात उघड झाले आहेत. नागपूरमधील भाजप नेत्यांना जनतेने नाकारले विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपची धुरा नागपूरच्या लोकांकडे असली की आम्ही बिनधास्त राहू कारण या लोकांना जनतेनी नाकारले आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे नेतृत्व करणार असतील तर चांगलेच आहे. तर भाजपकडे नाही आमच्याकडे कार्यकर्ते येत आहेत. आता आमच्याकडे इनकमिंग सुरू होत आहे, महायुतीकडे अवकाळी पावसाची झळ पोहोचणार आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article