हिंगोली(Hingoli) :- सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे गेल्या वर्षी मा. श्री आमदार तानाजी मुटकुळे पाटील यांच्या हस्ते महाळशी ते पानकनेरगांव ग्रामसडक मूख्यमनत्री सडक योजनेतून होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. जवळपास म्हाळशी ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे सदर हनुमान मंदिर ते 461 महामार्ग पर्यंत असलेलं उर्वरित काम बाकी आहे.
प्रशासनाची दडपशाही न्याय न मिळताच आंदोलक पोलीसांच्या ताब्यात
हा रस्ता गावातून न होता बायपास करण्यात यावा असा गावकऱ्याचा माणस आहे. कारण गावातून होणाऱ्या रस्त्यामुळे गावातील बालवाडी शाळा, दवाखाना(Hospital), ग्रामपंचायत, बँक(Bank), मुख्य बाजारपेठ, तसेच श्री संत गजानन महाराज मंदीर, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा, मुख्यमंत्री हे या रस्त्यावर पेयजल योजने अंतर्गत जल वाहणी टाकलेली असून त्या लगत असलेल्या गावकरी बांधवांना नळ जोडणी सुध्दा दिल्या गेलेली नाही, सदर प्रशासन व ठेकेदाराच्या अडमुठ्या धोरणामुळे हे लोक पाण्यावाचून वंचित राहू शकतात. त्यामुळे म्हाळशी हा रस्ता गावाच्या बाहेरून करण्यात यावा अनुषंगाने २३ सप्टेंबर रोजी प्रशासनाला रास्ता रोकोचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज पानकनेरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर संविधानिक मार्गाने गावकर्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला होता. सदर प्रशासनाकडून कुठला न्याय न मिळताच काही तासातच पोलिसांनी संजय देशमुख, गजानन क्षिरसागर, सुखदेव साळवे, शेखर देशमुख, नितिन देशमुख, भगवान आरे,शेषराव जोगदंड, रामप्रभू आकले,शिवाजीराव देशमुख, जगदीश देशमुख कैलास आप्पा हेंद्रे, कुलदीप देशमुख, आंदोलक ताब्यात घेतले. प्रशासनाची दडपशाहीमूळे आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.