गाेवा : पक्षश्रेष्ठींकडून सबुरीचा सल्ला

2 hours ago 2

मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न. Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Sep 2024, 11:31 pm

Updated on

30 Sep 2024, 11:31 pm

पणजी : मागील अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळांतर्गत सुरू असलेला संघर्ष वाढल्याने हे प्रकरण आता दिल्ली दरबारी पोहोचले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री राणे यांना सबुरीने घेत राजकारभार चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी विशेष बैठकीत विविध विषयांवर दीर्घ चर्चा करण्यात आली. विरोधकांना टीका करण्याची संधी मिळू नये, लोकांत नाराजी पसरू नये याबाबत दक्ष राहण्यासंदर्भात, सरकारच्या धोरणाविरोधात जर मंत्री, आमदार बोलत असतील तर त्यांनी बोलू नये या संदर्भातही सूचना करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदल, पक्षांतर्गत नेतृत्व बदल, राज्यात गाजत असलेली भूरूपांतरे, बेकायदा डोंगर कापणी, मेगा प्रकल्प आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला.

दिल्लीतील बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेले मेगा बांधकाम प्रकल्प, त्यांना देण्यात आलेले ना हरकत दाखले, नगर नियोजन व नगर विकास, महसूल, सरकारी नोकर्‍या, सार्वजनिक बांधकाम खात्यातील गैरव्यवहार यासह रखडलेला मंत्रिमंडळातील फेरबदल यावर चर्चा झाली. 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना वगळून अन्य आमदारांना मागील दोन वर्षांपासून लाभाची पदे आणि मंत्रिपदे मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यातही असंतोष वाढला आहे. याशिवाय मंत्रिमंडळ अंतर्गत कुरबुर वाढल्याने अनेक मंत्री परस्पर विरोधी आणि इतरांच्या खात्यांवर टीकाटिप्पणी करत आहेत. याचा एकूणच परिणाम राज्य सरकार आणि भाजपच्या प्रतिमेवर होत आहे.

सरकार विरोधात लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. दुसरीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर केलेली टीका-टिपणी, त्यावर मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेली उत्तरे या आधारावर राज्यात आणि प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात ‘रील’ बनवून त्या समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. याचाही भाजपच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होत आहे. या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिगंबर कामत यांना सभापतीपद?

प्रामुख्याने दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून पक्षश्रेष्ठींमध्येच दोन मते असून त्यांना सभापतीपद देऊन सन्मानाने पक्षासोबत ठेवावे आणि त्यांच्या मुलाचे राजकीय पुनर्वसन करावे, असाही विचार व्यक्त करण्यात आलेला आहे. यासह मंत्रिमंडळातील काहींना बदलून त्यांच्या जागी नवे मंत्री घ्यावेत यावरही एकमत झाले आहेत. याबाबतचा निर्णय नवरात्रीच्या दरम्यान होईल, अशी शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. सरकारी नोकर्‍या, मेगा प्रकल्प, डोंगर कापणी, बेकायदेशीर भूरूपांतराबाबतही चर्चा होऊन हे प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा सल्ला बैठकीत देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

बैठक दिल्लीत, चर्चा राज्यात

दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी बोलावून घेतल्याने राज्यात चर्चेला उधाण आले आहे. समाज माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा चालू आहे. प्रामुख्याने मंत्रिमंडळातील फेरबदल या विषयावर जोरदार चर्चा सुरू होती. 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेल्या आठ आमदारांपैकी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे, यावरही नेटिझन्स मतमतांतरे व्यक्त करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article