जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय:शरद पवार यांचे आरक्षण आंदोलनावर मत, जागावाटपावर देखील केले भाष्य

2 hours ago 2
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत, असे मत शरद पवारांनी मांडले आहे. तसेच सरकारने देखील याबाबत विलंब लावू नये, असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिला आहे. जागावाटपावर काय म्हणाले शरद पवार? आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढताना त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कोणी ती जागा लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागेल, ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर प्रत्येक पक्ष कोणता उमेदवार द्यायचा यावर विचार करेल, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. आरक्षण प्रश्नी काय म्हणाले शरद पवार? राज्यात सुरू असलेल्या आरक्षण मुद्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आरक्षणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र तणाव होण्याचे कारण नाही, शेवटी आपण सगळे जात धर्म काही असली तरी भारतीय आहोत. महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसे करता येईल याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. याच सोबत राज्य सरकारने देखील या प्रश्नांना विलंब लावू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता करून वातावरण चांगले कसे राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला आहे. अरविंद केजरीवाल चांगले काम करत होते दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल चांगले काम करत होते. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. यानंतर अरविंग केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली त्यांचे काम आम्ही दिल्लीत पाहिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून या पूर्वी दोन महिला नेत्यांनी नेतृत्व केले होते. त्याच प्रकारे अतिशी देखील काम करत दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article