दिव्य मराठी इम्पॅक्ट; गुलाल उधळण प्रकरण:अकरा कर्मचाऱ्यांचे एक वेतनवाढ थांबविण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
2 hours ago
1
वर्धा येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य निरीक्षकाचा सेवानिवृत्त कार्यक्रमात आयोजित करीत त्यात गुलाल उधळण व बँड वाजविण्यात आला होता. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आणि मौखिक आदेश देत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी अकरा कर्मचाऱ्यांचे एक वेतनवाढ थांबविण्याचे आदेश निर्गमित केले असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा हिवताप विभाग प्रशासकीय इमार विभागातील ए.आय. शेख आरोग्य निरीक्षक दिनांक ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याने, त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. दुपारच्या वेळी कार्यालयात जेवणाचे आयोजन करीत शहरातील एका कॅटरर्सला देण्यात आले होते. कॅटरर्स धारकाने प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा हिवताप विभागाच्या दालनासमोरच जेवणाची व्यवस्था केली होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेवणाच्या मेजवानीवर ताव मारला आणि जेवण झडण्यासाठी बँड बोलाविण्यात आला होता. कार्यालयाची वेळ समाप्त होण्याआधीच बँड वाजवण्यास सुरुवात झाली आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी बँडच्या आवाजाने चकित झाले.जेवणाची मेजवानी सुरु असताना, सुगंध येत असल्याने, अनेक कर्मचारी जिल्हा हिवताप विभागाकडे बघत होते. बँड वाजविणे हा प्रकार योग्य नसल्याचे इतर अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी याप्रकरणाची दखल घेतली आणि कारवाई करण्याकरिता जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे यांना मौखिक आदेश दिले होते. जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि सेवानिवृत्त कार्यक्रमात गुलाल उधळण व बँड वाजविण्यात आला होता.त्या कार्यक्रमात अकरा महिला व पुरुष कर्मचारी दोषी आढळून आल्या प्रकरणी अकरा कर्मचाऱ्यांचे एक वेतनवाढ थांबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.भविष्यात असे कारनामे होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. या केलेल्या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जुलै महिन्यात होणारी पगार वाढ थांबविण्याचे आदेश शासकीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात एक वर्षांचे वेतनवाढ दिली जाते.जुलै महिन्याच्या आधी कुठल्याही प्रकारची कारवाई कर्मचाऱ्यांवर झाल्यास पगार वाढ थांबविली जातात.त्यामुळे या अकरा कर्मचाऱ्यांचे एक वर्ष पगार वाढ होणार नाहीत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)