भगवान श्री पांडुरंग भक्तीचा अमृत सोहळा:भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अन्वा येथे 1630 पासूनची परंपरा; पहा भक्तीरसाचे VIDEO
2 hours ago
1
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अन्वा येथे माघ महिन्यात होणारा उत्सव हा भक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी असतो. संत श्री विठोबा दादा महाराज यांनी ई.स.1630 साली भगवान श्री पंढरी नाथांची व रुक्मिणी मातेची स्थापना केली. तेव्हा पासून उत्सवाची परंपरा कायम आहे. परंपरेने माघ शुद्ध दशमीला पालखी सोहळ्याने उत्सवाची सुरुवात होते. मुख्य दिनी माघ शुद्ध एकादशीला भगवान पांडुरंगाच्या रथोत्सव दिंडी मिरवणूक आणि माघ शुद्ध त्रयोदशीला काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची समारोप असे साडे तीन दिवस उत्सव उत्सव संपन्न होतो. माघ उत्सव हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो भक्ती, परंपरा, आणि निष्ठेचा उत्सव आहे. श्रीक्षेत्र अन्वामध्ये प्रत्येकाला विठ्ठल भक्तीचा अनमोल अनुभव मिळतो. या भक्तिरसाचा लाभ घेण्यासाठी आणि पांडुरंगाच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी सर्व भाविकांनी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. चातुर्मास्ये महाराज परंपरेची ओळख चातुर्मास्ये महाराज ही श्रीक्षेत्र पंढरपुरातील वारकरी संतांची परंपरा आहे, जिथे महाराज पंढरपूरमध्ये चार महिने वास्तव्य करतात. चातुर्मासादरम्यान पंढरपूरच्या मठामध्ये रोज श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, हरिपाठ, जागर नित्यक्रम सुरू असतो. या काळात श्री महाराजांचा गुरु भक्तांना सहवास लाभतो. भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र अन्वा येथे भगवान पांडुरंग आणि रुख्मिणी मातेच्या सुंदर मूर्ती आहेत, ज्यांच्या प्रती भक्तांची अपार श्रद्धा आहे,ज्या भाविकांना एकादशी दिवशी पंढरपूर येथे जाणे शक्य नाही ते अनव्याच्या विठूमाउली चे दर्शन आवर्जून घेतात ,यामुळेच भाविक श्रीक्षेत्र अन्व्याला प्रती पंढरपूर देखील म्हणतात. अन्वा - जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अन्वा हे पुरातन वारकरी भक्तीपीठ असून श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम स्थळ आहे. येथे सद्गुरु दादा महाराज चातुर्मास्ये यांनी ३००-३२५ वर्षांपूर्वी श्री विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित केली, जी आजही अखंड तेवत आहे. वारकरी संप्रदायाच्या या पवित्र स्थळाने मराठवाडा, खान्देश, मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे जीवन भक्तिरसात न्हालवले आहे. श्री विठ्ठलचा जयघोष अन् वारकऱ्यांचे खेळ रथ सोहळा गावातील प्रमुख चौकात पोहोचताच वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला अन् वारकऱ्यांच्या पावल्या, फुगड्या हे खेळ रंगले. यावेळी श्री विठ्ठल, हरि नामाच्या जयघोषात आसमंतात दुमदुमून गेला. महाआरती होऊन रथ नगरप्रदक्षिणा करिता मार्गस्थ झाला, संत श्री विठोबा दादा महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात
भारूड झाले त्यानंतर रथोत्सवाचा समारोप झाला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)