भिवंडीतील लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग:अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल; गोदामात रसायनांचा मोठा साठा

2 hours ago 1
मुंबई जवळील भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. भिवंडीत भीषण आग लागण्याची ही घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळ घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गोदामात रसायनांचा मोठा साठा भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून खाक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे किती रुपयांचा माल जळाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आगीचे नेमके कारण देखील अद्याप कळालेले नाही. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... राज्यात NIA आणि ATS ची मोठी कारवाई:छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून तरुण ताब्यात; देश विघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा संशय महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांचा समावेश देश विघातक कृत्यांमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा देखील या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा... तिसऱ्या आघाडीमुळे माझी झोप उडाली, आता आमचे कसे होणार?:शरद पवार यांचा संभाजीराजे छत्रपतींना टोला; भयंकर अस्वस्थ असल्याचे म्हणत उडवली खिल्ली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. मात्र यातच राज्यांमध्ये परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा या तिसऱ्या आघाडीत समावेश आहे. या तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल, माझी तर झोप गेलीये, आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. अशा शब्दात पवारांनी या तिसऱ्या आघाडीला टोला लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा... आमदार इंद्रनील नाईकांना वाशिमच्या कार्यक्रमातून डावलले:मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही; जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांना वगळण्यात आले आहे. त्यांना डावल्यामुळे इंद्रनील नाईक हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांना जाणीवपूर्वक डावल्याची चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाली आहे. इतकेच नाही तर भाजपचे माजी आमदार निलय नाईक यांना देखील शासकीय निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article