मदरसा शिक्षकांना 10 हजार रुपये पगारवाढ वादात:उद्धवसेनेची सरकारवर टीका...आम्ही केले असते तर भाजप ‘व्होट जिहाद’ म्हणाले असते- राऊत

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी महायुती सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ८० निर्णय घेतले. त्यातील एक निर्णय वादात अडकला आहे. मदरशात शिकवणाऱ्या शिक्षकांचे वेतन १० हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. डीएड उत्तीर्ण मदरसा शिक्षकांचे मानधन ६ हजारांवरून १६ हजार रुपये तर बीए, बीएड व बीएस्सी पदवीधर मदरसा शिक्षकांचे मानधन ८ हजारांवरून १८ हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्याने महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. ही मते महाविकास आघाडीकडून खेचून आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधक करत आहेत. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘हा निर्णय आमच्या सरकारने घेतला असता तर भाजप यास ‘व्होट जिहाद’ म्हणाले असते. मग सरकारचा हा व्होट जिहाद नाही का? ’ अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, भाजपने मात्र आरोपांचे खंडन केले. ‘शिक्षण आमची पहिली प्राथमिकता आहे. शिक्षण देणारी कुठल्याही धर्माची संस्था असो, आम्ही त्यात भेद करत नाही’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article