'मराठवाड्यातील शिलालेख' अभिजात दर्जा मिळवून देण्यास महत्त्वाचा ठरला:प्रा. आनंद उबाळे यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाड्मय विभागाच्यावतीने वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये मराठी विभागाच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे सदस्य राहिलेल्या प्रा. आनंद उबाळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रा. उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी जाहीर नाराजी प्रकट करीत म्हटले की, आम्हाला आठ दहा वर्षांत कुणीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सादर केलेल्या अहवालात काय मांडले आहे, असे विचारले नाही. प्रा. आनंद उबाळे म्हणाले, आपला समाज प्रचंड भाषिक अनास्था असणारा समाज आहे. समितीने केलेल्या गंभीर कार्याचे स्वरूप थोडक्यात विशद करून याच मराठी विभागाचे संशोधक राहिलेल्या यु. म. पठाण यांच्या 'मराठवाड्यातील शिलालेख' या ग्रंथाचा उल्लेख करीत, हा ग्रंथ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरला असे ही ते म्हणाले. अभिजात ठरलेल्या मराठी भाषेला केंद्राकडून जो निधी प्राप्त होईल. त्यासाठी सजग राहून प्रयत्न करावे लागतील, असेही सुतोवाच डॉ. उबाळे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सुनील उबाळे हे उपस्थित होते. सुनील उबाळे यांनी विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला. कवी माणूस म्हणून वाट्याला आलेला संघर्ष उबाळे यांनी मांडला. व आपल्या कामगार विषयक जाणीव व्यक्त करणाऱ्या कविता वाचल्या. सुप्रसिद्ध कवी व मराठी भाषा व वाड्मय विभागाचे विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात दासू वैद्य यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले. विभाग नेहमीच परिघाबाहेरील महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. विभागात प्रवेश घेणारे विद्यार्थी खेड्यापाड्यांतील असतात. यांचे भान ठेवून विभागाने आतापर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या साहित्यिक प्रशांत गौतम यांना बालसाहित्याचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील एम. ए. व्दितीय वर्षांची विद्यार्थ्यांनी स्वाती गायकवाड हिने केले. स्वागतगीत नमिता त्रिभुवन हीने सादर केले तर आभार विशाखा भगत यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील विद्यार्थी लखन वानखडे, नीलेश पावरा, हनमंत गिरी, ललिता मगरे तसेच विभागातील प्राध्यापक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. रमेश जाधव, प्रा. रामेश्वर वाकणकर व डॉ. वाल्मिक वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article