महिनाअखेर सुरू होणार हंगामी वसतिगृहे‎:मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या 30 हजार मुलांची होणार सोय‎

2 hours ago 2
मराठवाड्यात सात जिल्ह्यांमधून ३०‎हजार विद्यार्थ्यांसाठी महिनाअखेर‎हंगामी वसतिगृहे सुरू होणार असून‎मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या‎वसतिगृहांच्या खर्चासाठी सुमारे ३०‎कोटी रुपयांचा निधी समग्र शिक्षा‎अभियान कक्षाने मंजूर केला आहे.‎त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांची‎मोठी सोय होणार आहे.‎ मराठवाड्यातून ऑक्टोबर महिन्याच्या‎अखेरपासून ऊसतोडीसाठी मोठ्या‎संख्येने मजुरांचे बाहेर जिल्ह्यात‎स्थलांतर होते. वाडी, तांड्यावरून‎होणाऱ्या या मजुरांच्या स्थलांतरामुळे‎ग्रामीण भागातील अनेक गावे ओस‎पडतात. धाराशिव जिल्हा वगळता‎इतर सर्व सात जिल्ह्यांतून मोठ्या‎संख्येने मजुरांचे स्थलांतर होते. यामध्ये‎बीड जिल्ह्यातून मजुरांच्या‎स्थलांतराची संख्या अधिक आहे.‎दरम्यान, स्थलांतरित झालेेले मजूर‎कुटुंबीयांसह पुणे, अहिल्यानगर,‎सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमधून‎कामाला जातात. ऑक्टोबर‎महिन्याच्या अखेरपासून स्थलांतरित‎झालेले कुटुंब थेट एप्रिल महिन्यातच‎गावी परततात. यामुळे त्यांच्या‎पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण‎होतो. त्यासाठी हंगामी वसतिगृहे सुरू‎केली जातात. विद्यार्थ्यांच्या भोजनाची‎व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीच्या‎मार्फत केली जात असून त्यासाठी‎एका विद्यार्थ्यामागे १० हजार रुपयांचा‎निधी खर्च केला जाणार आहे.‎ स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती घेतली‎ मराठवाड्यात या महिन्याच्या अखेरपासून वसतिगृहे सुरू केले‎जाणार असून त्यासाठी स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती घेतली‎जात आहे. स्थानिक गावपातळीवरून माहिती प्राप्त झाल्यानंतर‎तातडीने वसतिगृह सुरू करून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला‎जाणार आहे. मात्र या वर्षीही विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीच‎अनुदानासाठी बंधनकारक करण्यात आल्याचे शिक्षण‎विभागाच्या सूत्रांनी सांगितले.‎ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार‎ मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतून या वर्षी तब्बल ३० हजार‎विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हंगामी वसतिगृहे‎सुरू केली जाणार आहेत. स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांची‎माहिती घेऊन त्यांच्या विद्यार्थी पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश‎देऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी‎समग्र शिक्षा अभियान कक्षाकडून सुमारे ३० कोटी रुपयांचा‎निधी मंजूर करण्यात आला आहे.‎ जिल्हानिहाय विद्यार्थी‎ व मंजूर केलेला निधी‎ मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वात‎जास्त २३६८२ विद्यार्थ्यांसाठी हंगामी‎वसतिगृहे सुरू केले जाणार असून‎त्यासाठी २३.६८ कोटी रुपयांचा निधी‎मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती‎संभाजीनगर जिल्ह्यात ५१०‎विद्यार्थ्यांसाठी ५१ लाख रुपये, हिंगोली‎१८५ विद्यार्थ्यांसाठी १८.५० लाख रुपये,‎जालना ११८४ विद्यार्थ्यांसाठी १.१८ कोटी‎रुपये, लातूर ३१७ विद्यार्थ्यांसाठी ३१.७०‎लाख रुपये, नांदेड ३९४ विद्यार्थ्यांसाठी‎३९.४० लाख रुपये, परभणी ३१२५‎विद्यार्थ्यांसाठी ३.१२ कोटी रुपयांचा‎निधी मंजूर करण्यात आला आहे.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article