महिनाअखेर सुरू होणार हंगामी वसतिगृहे:मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या 30 हजार मुलांची होणार सोय
2 hours ago
2
मराठवाड्यात सात जिल्ह्यांमधून ३०हजार विद्यार्थ्यांसाठी महिनाअखेरहंगामी वसतिगृहे सुरू होणार असूनमार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या यावसतिगृहांच्या खर्चासाठी सुमारे ३०कोटी रुपयांचा निधी समग्र शिक्षाअभियान कक्षाने मंजूर केला आहे.त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचीमोठी सोय होणार आहे. मराठवाड्यातून ऑक्टोबर महिन्याच्याअखेरपासून ऊसतोडीसाठी मोठ्यासंख्येने मजुरांचे बाहेर जिल्ह्यातस्थलांतर होते. वाडी, तांड्यावरूनहोणाऱ्या या मजुरांच्या स्थलांतरामुळेग्रामीण भागातील अनेक गावे ओसपडतात. धाराशिव जिल्हा वगळताइतर सर्व सात जिल्ह्यांतून मोठ्यासंख्येने मजुरांचे स्थलांतर होते. यामध्येबीड जिल्ह्यातून मजुरांच्यास्थलांतराची संख्या अधिक आहे.दरम्यान, स्थलांतरित झालेेले मजूरकुटुंबीयांसह पुणे, अहिल्यानगर,सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमधूनकामाला जातात. ऑक्टोबरमहिन्याच्या अखेरपासून स्थलांतरितझालेले कुटुंब थेट एप्रिल महिन्यातचगावी परततात. यामुळे त्यांच्यापाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माणहोतो. त्यासाठी हंगामी वसतिगृहे सुरूकेली जातात. विद्यार्थ्यांच्या भोजनाचीव्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीच्यामार्फत केली जात असून त्यासाठीएका विद्यार्थ्यामागे १० हजार रुपयांचानिधी खर्च केला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती घेतली मराठवाड्यात या महिन्याच्या अखेरपासून वसतिगृहे सुरू केलेजाणार असून त्यासाठी स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती घेतलीजात आहे. स्थानिक गावपातळीवरून माहिती प्राप्त झाल्यानंतरतातडीने वसतिगृह सुरू करून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाजाणार आहे. मात्र या वर्षीही विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीचअनुदानासाठी बंधनकारक करण्यात आल्याचे शिक्षणविभागाच्या सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतून या वर्षी तब्बल ३० हजारविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हंगामी वसतिगृहेसुरू केली जाणार आहेत. स्थलांतरित झालेल्या कुटुंबीयांचीमाहिती घेऊन त्यांच्या विद्यार्थी पाल्यांना या वसतिगृहात प्रवेशदेऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठीसमग्र शिक्षा अभियान कक्षाकडून सुमारे ३० कोटी रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय विद्यार्थी व मंजूर केलेला निधी
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वातजास्त २३६८२ विद्यार्थ्यांसाठी हंगामीवसतिगृहे सुरू केले जाणार असूनत्यासाठी २३.६८ कोटी रुपयांचा निधीमंजूर करण्यात आला आहे. छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात ५१०विद्यार्थ्यांसाठी ५१ लाख रुपये, हिंगोली१८५ विद्यार्थ्यांसाठी १८.५० लाख रुपये,जालना ११८४ विद्यार्थ्यांसाठी १.१८ कोटीरुपये, लातूर ३१७ विद्यार्थ्यांसाठी ३१.७०लाख रुपये, नांदेड ३९४ विद्यार्थ्यांसाठी३९.४० लाख रुपये, परभणी ३१२५विद्यार्थ्यांसाठी ३.१२ कोटी रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)