मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला बसला आहे. कारण दोन्ही वाहतूक विस्कळीत झाल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धातास उशिराने धावत आहे. विजांच्या कडकडाट अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडून मुंबईला येणारे विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे उद्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.