लोकप्रतिनिधी, प्रमुख व्यक्तींशी राज्यपाल आज साधणार संवाद:आजी-माजी खासदार, साहित्यिकांसह पक्ष पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

1 hour ago 1
अमरावती महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरूवारी ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी येथे येत आहेत. दोन तासांच्या भेटी-गाठी आणि रात्रीचा मुक्काम असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे. भेटीगाठी दरम्यान ते जिल्ह्यातील सन्माननीय व्यक्ती, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. जिल्ह्यात कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत आणि प्रशासन त्यासाठी कसे मदतीचे ठरु शकते, हे जाणून घेणे, हा त्यांच्या भेटीगाठींचा मुख्य गाभा आहे. यादरम्यान होणाऱ्या चर्चेचा वृत्तांत ते राज्य सरकारला कळवणार असून, त्याचवेळी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत निर्देशही देणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गुरूवारी, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता वर्धा येथून बेलोरा विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ३.४५ वाजता ते अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते विविध घटकांशी भेटी घेऊन चर्चा करतील. अमरावतीत पोहोचल्यानंतर दुपारी ४ वाजता शहरातील काही प्रमुख मान्यवर व्यक्तींशी ते चर्चा करतील. यामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेले प्रा. वसंत आबाजी डहाके आणि इतरांचा समावेश आहे. अर्ध्या तासाच्या या भेटीनंतर आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचा संवाद होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील खासदार व आमदार माजी खासदार-आमदारांना निमंत्रीत केले आहे. सायंकाळी ५ पासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी राज्यपाल चर्चा करणार आहेत. दोन तासांच्या या भेटीगाठीनंतर गुरुवारी रात्री त्यांचा येथेच मुक्काम आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी, ४ ऑक्टोबरला सकाळी ९.१० वाजता ते विश्रामृगह येथून बेलोरा येथील हेलिपॅडकडे प्रयाण करतील. सकाळी ९.४० वाजता शासकीय हेलीकॉप्टरने बुलडाण्याकडे प्रयाण करतील. त्यानंतर सायंकाळी अकोला येथे पोहोचून अमरावतीप्रमाणेच भेटीगाठी व संवादाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यपालांसोबतच्या चर्चेची उत्कंठता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील सर्वोच्च पद आहे. त्यातही विशेष असे की ते जनतेच्या प्रतिनिधींना भेटतात, हे पहिल्यांदाच घडते आहे. ते शहरातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधणार असल्याने त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेला अनन्यसाधारण महत्व आहे. या चर्चेची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. भेटीअंतीचा अहवाल कळल्यानंतरच ती शमणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article