विजय काय असतो हे आम्ही दाखवून दिले:आदित्य ठाकरे यांचा दावा; EC ला भाजपच्या कार्यालयातून निवडणुकीची परवानगी घेण्याचा टोला

1 hour ago 1
सिनेटच्या निवडणुकीत आमचे 10 पैकी 10 उमेदवार विजय झाली. विजय काय असतो हे आम्ही दाखवून दिले. असाच विजय आम्हाला विधानसभा निवडणुकीत मिळवायचा असून, ही त्याची केवळ सुरुवात आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाने भाजप कार्यालयातून घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला हाणला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यशानंतर आज विजयी उमेदवारांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा जोरदार जल्लोष केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी सिनेटची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची 'लिटमस टेस्ट' होती असा दावा केला. तसेच विधानसभा निवडणुकीतही असाच विजयाचा गुलाल उधळण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही आदित्य ठाकरे म्हणाले, सिनेटच्या निवडणुकीत आमचे 10 पैकी 10 उमेदवार विजय झाले. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. विजय काय असतो हे आम्ही काल दाखवून दिले. असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत मिळवायचा असून, ही त्याची सुरुवात आहे. मागील 2 वर्षांपासून या निवडणुकीची तयारी केली जात होती. पण सरकारकडून ही निवडणूक लांबणीवर टाकली जात होत होती. सिनेट निवडणुकीसाठी आमच्या पक्षाने ऐतिहासिक नोंदणी केली होती. एवढी नोंदणी 40 गद्दार पक्षात असतानाही झाली नव्हती. याला घाबरून भाजप व मिंधे सरकारने ही निवडणूक दोनदा रद्द केली. त्यानंतर आमची नोंदणी 13 हजारांपर्यंत कमी करण्याचे कारस्थान रचले. पण त्यानंतरही आम्हाला या निवडणुकीत 90 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर असलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या आदित्य ठाकरे आपल्या कार्यर्त्यांना पुढे म्हणाले, आजपासून आपल्या विजयाची सुरुवात झाली आहे. विजयाचा हा गुलाल आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीतही मातोश्री व शिवसेना भवनापुढे उधळायचा आहे. मतदार यापुढेही असाच विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीवर दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा. ज्यांना पक्षातून जायचे आहे त्यांना जाऊ द्या. मतदारांचा आपल्यावरील हा विश्वास केव्हाच तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीतही आम्ही आमची मुंबईतील ताकद दाखवली. त्यावेळी आमची 1 जागा त्यांनी चोरली. त्यानंतर पदवीधर निवडणुकीत आमचा विजय झाला. त्यानंतर आजही आम्ही गुलाल उधळला. निवडणूक आयोगाला हाणला टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्यातील कायदा सुव्यवस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवरूनही महायुती सरकार व निवडणूक आयोगाला टोला हाणला. निवडणूक आयोगाने भाजपच्या कार्यालयातून महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची की नाही याची परवानगी घ्यावी. सध्या मुंबई महापालिकाच नाही तर सर्वच महापालिकांची निवडणूक घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. राज्याला गृहमंत्री आहेत किंवा नाही? अशी स्थिती आहे. कुणालाच कुणाचा वचक राहिला नाही. त्यामुळे दररोजच मुंबईला हाय अलर्ट जारी होतील अशी स्थिती आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article