परभणी(Parbhani):- सेलू तालुक्यातील वालूर येथे शेती नावावर करण्याच्या कारणावरून एका ४० वर्षीय इसमास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोन महिलासह एका जणावर २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिलासह एका जणावर २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथे नमूद आरोपीतांनी संगमत करून अतुल सूर्यभान पांढरे ४० वर्षे राहणार वालूर हल्ली मुक्काम शेत गट क्रमांक ८५/३आखाड्यावर असलेल्यास त्यांच्या नावे असलेली शेती सोनाली अतुल पांढरे यांच्या नावावर करण्याच्या कारणावरून उभयतात २३ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता वाद झाला तेव्हा सोनाली पांढरे हिने अतुल पांढरे यास शिविगाळ (Abusing)केली. तिच्यासोबत असलेल्या यमुनाबाई आश्रोबा बेगाळ व आश्रोबा राजाराम बेगाळ दोन्ही राहणार वालूर यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सोनाली पांढरे हिने घरात असलेली लोखंडी शिलाई मशीन (Machine) हातामध्ये घेऊन अतुल पांढरे यास डोळ्याच्या भुईवर मारून दुखापत केल्याप्रकरणी आतुल सूर्यभान पांढरे यांने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत.