निवडणूक आयुक्तांची घोषणा:मतदानाच्या दिवशी मिळणार पगारी सुट्टी, अन्यथा संस्थांवर थेट कारवाईचे आदेश

2 hours ago 1
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आढावा घेण्यासाठी राज्यात दोन दिवसीय दौऱ्यावर होते. गत दोन दिवसांत राज्यातील राजकीय पक्षांची चर्चा केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. मतदानाचा दिवशी पगारी सुट्टी राहील, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली. ज्या संस्था, कार्यालये, मतदानाच्या दिवशी सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आयोगाने सांगितले आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे. गरीब वस्तीतील तसेच रोजंदारीवर जाणारे कामगार मतदानाच्या दिवशी सुट्टी नसल्यामुळे मतदान करण्यास जात नाहीत. त्या दिवशी आपला खाडा लागेल, रोजगार कापला जाईल, अशी त्यांना भिती असते. पण कामगारांनी मतदानाला प्रतिसाद द्यावा, यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आपला पगार किंवा रोजगार कापला जाईल, अशी भीती न बाळगता कामगारांनी मतदानासाठी यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. तसेच कामगार किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी न देणाऱ्या संस्था आणि कार्यालयांवर कारवाईचे थेट आदेश राहतील, असेही आयोगाने सांगितले आहे. खर्चाची मर्यादा वाढणार नाही निवडणुकीत सध्या खर्चाची मर्यादा 40 लाखांची मर्यादा आहे. खर्चाचे रेट अधिक असल्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी अशी विनंती पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत विचार केला जाईल. खर्चाची लिमिट देशव्यापी असते. ती एका राज्यासाठी होत नाही. दोन ते तीन वर्षात आम्ही त्याचा रिव्ह्यू करतो. सध्या तरी खर्चाची मर्यादा तीच राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील संख्या 19.48 लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article