विरोधकांना फक्त खुर्चीच दिसते:राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

5 days ago 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भर गर्दीत झालेल्या या घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी विरोधकांकडून होत आहे. या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एवढी गंभीर घटना घडून देखील विरोधकांना फक्त खुर्चीच दिसते, अशी टीका फडणवीसांनी केली. माझी बाबा सिद्दीकी यांच्याशी निकटची मैत्री होती. आम्ही अनेक वर्ष सोबत काम केले. त्यांच्या हत्येमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पकडले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील धागेदोर मिळत आहेत. पण त्यासंदर्भात लगेच बोलणे योग्य होणार नाही. आरोपींची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल त्या संदर्भात पोलिस माहिती देतील, असे फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या केवळ चौकशी नको तर तुम्ही सत्तेतून बाहेर पडा या, विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना केवळ सत्ता हवी आहे, इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे, महाराष्ट्राचा विकास आणि सुरक्षा पहायची आहे. पण ते खुर्चीकडे पाहत आहेत, त्यांनी खुर्चीकडे बघावे, जे बोलायचे आहे, ते बोलावे, अशी टीका विरोधकांवर केली आहे. पोलिस सर्व माहिती देतील एका महिन्यापासून रेकी सुरू होती, या सगळ्या थेरीज कुणालाही माहीत नाही तसेच त्या अधिकृत नाहीत. काही अँगल्स लक्षात येत असून त्यावर चौकशी सुरू आहे. मुळ चौकशीवर परिणाम होणार नाही, अशाप्रकारची देण्यासारखी पोलिस देतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. काय म्हणाले संजय राऊत? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय असे गृहमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे सांगण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा मागावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. फडणवीसांचे अध्यपतन आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. विरोधकांच्या विरोधात काड्या करण्यापेक्षा, रात्री होडी घालून फिरण्यापेक्षा, आपल्यावर राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पदाला कर्तव्य भावनेने जागून काम करा, असे आवाहन राऊत यांनी केले आहे. काय म्हणाले वडेट्टीवार? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. गुन्हेगारांना वचक राहिला नसून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. चार दिवसांनंतर आचारसंहिता लागू होईल. आम्ही त्यांचा राजीनामा मागून आमचे तोंड खराब करु इच्छित नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राचे गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, हे स्वत:ला विचारा, असे मी फडणवीसांना विचारणार आहे. एवढे सगळे होऊनही तुम्हाला त्या पदावर राहायचा अधिकार असेल तर बसा. पुन्हा राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडाला तरी तुम्हाला खुर्ची प्रिय आहे, हे जनता बघेल, अशी टीका त्यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article