शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांवर लादणार‎ नाही, चर्चेतून समस्या सोडवणार- शिंदे:नांदेडमध्ये उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही, मोंढा मैदानावर साधला संवाद‎

3 hours ago 1
शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवर‎जबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोध‎असेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.‎विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंट‎बदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांना‎विकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धी‎महामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता. मात्र,‎त्याचे महत्त्व समजल्यावर लोकांनी स्वतःहून जमीन‎दिली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.‎ गुरुवारी (दि. ६) नवा मोंढा मैदानावर झालेल्या‎आभार सभेत ते बोलत होते. दुपारी २.३० वाजता‎उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. विधानसभा‎निवडणुकीत बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला‎असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी‎मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अडीच‎वर्षे विरोधकांनी शिव्या दिल्या तरी आम्ही आमच्या‎कामांतून त्यांना उत्तर दिले. त्यामुळे जनता आमच्या‎सोबत आहे. शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून‎ओव्याच बाहेर पडल्या, असेही त्यांनी सांगितले.‎सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देणाऱ्या कोणत्याही‎योजना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.‎व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,‎आमदार हेमंत पाटील, बालाजीराव कल्याणकर,‎आनंदराव बोंढारकर, माजी खासदार सुभाषराव‎वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.‎ मराठवाड्याची दुष्काळवाडा ही‎ओळख पुसायची आहे. महायुती‎सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड‎योजनेला चालना दिली. जलयुक्त‎शिवार योजना पुन्हा सुरू केली.‎महाविकास आघाडीने बंद केलेले‎प्रकल्प आणि कामे पुन्हा सुरू केले,‎लोकाभिमुख योजना राबवल्या.‎त्यामुळे मुख्यमंत्री किंवा‎उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या‎बहिणींचा लाडका भाऊ म्हणून‎मिळालेला बहुमान मोठा आहे, असे‎त्यांनी सांगितले. एमआयडीसीचा‎प्रश्न सोडवणार, पाणी आणि‎रस्त्यांसह रखडलेले अन्य प्रश्न‎मार्गी लावणार, असेही एकनाथ शिंदे‎यांनी स्पष्ट केले.‎ अजित पवारांमुळे शतक हुकले गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी‎ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आमच्या गटात‎सामील झाले. ते आले नसते तर आमच्या लढवायच्या जागा वाढल्या असत्या आणि आम्ही विजयी जागांचे शतक‎पूर्ण केले असते. शिवसेना फोडण्याचे काम संजय राऊत यांनी केले, अशी टीका मंत्री पाटील यांनी भाषणात केली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article