शबरी घरकुलसाठी इगतपुरीत बिऱ्हाड मोर्चा:आदिवासींचे घरकुलाचे प्रस्ताव वर्षभरापासून पडून, लाभार्थी वंचित असल्याने संताप

3 hours ago 1
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे पंचायत समिती कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. वर्षभरापासून आदिवासी कुटुंबातील अनेक लाभार्थी वंचित आहेत. बेघर आदिवासींचे घरकुलासाठीचे प्रस्ताव वर्षभरापासून पडून आहेत. यामुळे संतप्त लाभार्थींसह एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ३०) पंचायत समिती कार्यालयासमोर बिऱ्हाड मोर्चा काढून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा निर्णय घेतला. एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी वरिष्ठांशी या विषयी चर्चा करत संघटनेचे प्रमुख भगवान मधे यांना घरकुलांबाबत माहिती देत लवकरच मंजूर प्रस्ताव पाठवून बेघर वंचित लाभार्थींना घर मिळेल असे सांगितले. याप्रसंगी एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांना निवेदन देण्यात आले. मागण्या त्वरीत सोडवल्या नाही तर पुन्हा बिऱ्हाड मोर्चा पंचायत समिती कार्यालयात मुक्कामी तळ ठोकून राहील असा इशारा मधे यांनी दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article