संत श्री संताजी महाराज जगनाडे महामंडळ स्थापना:देवीची आरती करुन जल्लोष, संताजी भवन येथे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने मिठाई वाटप‎

2 hours ago 1
संत श्री संताजी महाराज जगनाडे आर्थिक विकास महामंडळ राज्य शासनाने मंजूर केल्याबद्दल नगर येथे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने संताजी भवन येथे जल्लोष करुन मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक विजय दळवी, रमेश सांळुके, रामदास महाराज क्षीरसागर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षिरसागर, सचिव शोभना धारक, खजिनदार प्रकाश सैंदर आदी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे म्हणाले, संताजी महाराज जगनाडे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करुन सरकारने समस्त तेली समाज बांधवांसाठी नवरात्रीत अनोखी भेट दिली. या लढ्यासाठी प्रांतिकचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे, प्रांतिकचे खा.रामदास तडस, महासचिव भूषण कर्डिले, उपाध्यक्ष संजय विभुते व राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समाजाच्या सर्व मागण्यांची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक महामंडळाची घोषणा केली. या महामंडळाचा समाजातील सर्वांना फायदा होणार असल्याने या महामंडळाच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्‍न मार्गी लागणार, त्यामुळे नगर येथे संताजी भवन येथे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने देवीची आरती करुन जल्लोष करण्यात आला. तसेच समाज बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक विजय दळवी म्हणाले, तेली समाज हा व्यावसायिक समाज आहे. त्यामुळे या महामंडळामुळे आर्थिक भांडवल उपलब्ध होणार आहे. मागील ३० वर्षांपासून या मागणीसाठी समाज लढा देता होता, तरुणांना नवीन तेल उद्योग सुरु करण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक बळ मिळणार आहे. सुट्या तेल विक्रीवर बंदी सरकारने बंदी घातली होती. आर्थिक परिस्थिती नाजुक असलेल्या परिवारांना तेल विकत घेता येत नव्हते. परंतु या माध्यमातून ती बंदी उठवण्यात आल्यामुळे गरीब कुंटूंबाना आता सुटे तेल घेता येईल. विविध संस्थांच्या माध्यमातून छोठे मोठे तेल उद्योगाला या महामंडळाच्या माध्यमातून चालना मिळणार असल्याचे सांगितले. प्रास्तविक रमेश सांळुके यांनी, सुत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी, तर गोकुळ कोटकर यांनी आभार मानले. संधीचा फायदा घेऊन समाजाचे नाव उंचवावे या महामंडळामुळे तरुणांना मोठा फयदा होणार आहे. त्यामुळे नव तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन तिळवण तेली समाजाचे नाव उंचवावे तसेच आपल्या स्वत:च्या पायावर उभे रहावे. सरकार संधी देते, त्यांचा लाभ आपल्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना होतो. तेली समाजच्या लढ्याला यश आले आहे. समाजाच्या विविध प्रश्‍न मार्गी तेव्हाच लागते, जेव्हा समाज एकत्र येऊन लढा देत असतो, असे रामदास महाराज क्षीरसागर म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article