सागर बंगला अन् वर्षा बंगला यात 5 पाऊलांचे अंतर:फडणवीस यांनी तात्काळ वर्षा बंगल्यावर गेले पाहिजे- संजय राऊत

2 hours ago 1
सागर बंगला आणि वर्षा बंगला यात 5 पाऊलांचे अंतर आहे. एक बंगला रामटेक आणि दुसरा लखनऊला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ वर्षा बंगल्यावर गेले पाहिजे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. राज्याचे मंत्रिमंडळ हा वेड्याचा बाजार आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर जायला हवे कारण ते त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. फडणवीस वर्षा बंगल्याबाबतचे ताक फुंकून पित आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की त्यांची मुलगी 10 बोर्डाची परीक्षा देत आहे. माझ्या तिला शुभेच्छा आहेत ती बोर्डात पहिली यावी. सागर बंगला आणि वर्षा बंगला यात 5 पाऊलांचे अंतर आहे. काय सागर बंगला रामटेकला अन् वर्षा बंगला लखनऊला असे नाहीना. 2000 लाेकं बेपत्ता प्रयागराजमधील महाकुंभ हा धार्मिक अस्थेचा विषय आहे. त्यात जी दुर्घटना घडली त्याला कुणी तरी जबाबदार आहे. तिथे किती जण मरण पावले हा माझा प्रश्न होता. त्यासाठी कुणी एक व्यक्ती किंवा सरकार दोषी आहे असे मी म्हणत नाही. दोन ते अडीच हजार लोकं त्या दिवसापासून बेपत्ता आहे. चार दिवसांपूर्वी कचऱ्याचा ढिगाऱ्याखालून प्रेत काढण्यात आली आहे. लोकांच्या माहितीनुसार दोन ठिकाणी चेंगराचेगरी झाली तिथे 1500 ते 2000 हजार लोकं मरण पावले असावे. प्रेत कुणी गायब केली का? संजय राऊत म्हणाले की, प्रयागराज कुंभमेळ्याच्या ठिकाणी 30 हजार सीसीटीव्ही लावले आहेत. त्यांचे फुटेज समोर का आणले जात नाही, ते आणले तर लोकांना खरी परिस्थिती समोर येईल. 2000 हजार लोकं त्या दिवसानंतर बेपत्ता आहेत. ही लोकं मरण पवाली का? त्यांची प्रेत सापडत नाही की ती प्रेत कुणी गायब केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत आपची सत्ता येईल संजय राऊत म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत शिवसेनेची चार मतेही नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये म्हटले. त्यांचे म्हणणे बरोबर आहे, EVM मध्ये आमची मते नसतील पण बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर आमची किती मते आहेत हे तुम्हाला समजेल. महाराष्ट्र असो की दिल्ली बॅलेट पेपरवर जर निवडणूक घेण्याची हिंमत फडणवीसांच्या बॉसेसने दाखवावी मग आमचे कोणत्या राज्यात किती मते आहेत हे दाखवून देऊ. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उभा राहिल असे मला वाटते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article